19. राजपुत्र आणि त्याचा सेवक
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
19. राजपुत्र आणि त्याचा सेवक
(The Prince and the Servant)
***********************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंडः बोधिसत्व हे बुद्ध कसे झाले
*********************
भाग पहिला- जन्मापासून परिव्रज्येपर्यंत
*********************
19. राजपुत्र आणि त्याचा सेवक
(The Prince and the Servant)
***********************
1) कंठकाला घेऊन छन्नानेही घरी परतायला पाहिजे होते. पण त्याने परत जाण्याचे नाकारले. त्याने राजपुत्राला कंठकासह अनोमा नदीच्या तीरापर्यंत तरी पोहोचविण्याचा आग्रह धरला. छन्नाचा आग्रह इतका होता की, त्याच्या इच्छेपुढे गौतमाला माघार घ्यावी लागली.
2) शेवटी ते अनोमा नदीच्या तीरावर येऊन पोहचले.
3) तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला: "मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील निष्ठा स्पष्ट झाली आहे. तुझ्या माझ्यासाठीच्या आपलेपणाने व प्रेमाने तू माझे ह्रदय जिंकले आहेस."
4) "तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे."
5) "ज्यांच्याकडून आपणाला लाभ होणार आहे, त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही? पण चांगली वेळ निघून गेली की, आपली वाटणारी माणसेदेखील सहसा परक्यासारखी वागतात."
6) "कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी आधारासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतुशिवाय निःस्वार्थीपणा असे काही नसते."
7) "तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा."
8 ) "महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील."
9) "त्यांना सांग की, मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही."
10) "घर सोडून अशा रीतीने मी निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करु नये. सहवास हा कितीही दीर्घ काळ टिकला तरी काही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच."
11) "जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत?"
12) "माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निःसंशय वारसाहक्क सांगणारे लोक असतात. परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते. किंबहुना ते नसतातच."
13) "महाराजांची, माझ्या पिताजींची - सेवा -सुश्रुषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की, 'मी अवेळी निघून गेलो.' पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते."
14) "ह्या आणि अशाच शब्दात मित्रा, महाराजांना सांग आणि जेणेकरुन ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत रहा."
15) "आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की, तिच्या वात्सल्यप्रेमाला मी किती तरी अपात्र आहे. ती फार महान स्त्री आहे. तिची थोरवी शब्दात सांगता येण्यासारखी नाही."
16) हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला,
17) "स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुतून बसावा तशी तुम्ही तुमच्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे."
18) "तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही? ज्यांचे अंतःकरण प्रेमाने उंचबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलावयास नको."
19) "कुठे तुमचा तो प्रासादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी!"
20) "हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ?"
21) "एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय? त्याच प्रमाने स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय?"
22) "आणि तुझी आई जिने तुला लहानाचा मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिला एखादा कृतघ्न माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय?"
23) "जी सदगुणांची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची किर्ती वाढली आहे, जी पतीस समर्पित असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय?"
24) "धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यांना सर्वश्रेष्ठ असणारा तू, एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय?"
25) "आणि तू तुझे आप्त, नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे. कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे."
26) "अशा प्रकारे माझे अंतःकरण होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही."
27) "तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील? आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू?"
28) "राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस. पण ते कोण खरे मानील? आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही."
29) "जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभणारे नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर!"
30) दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले:
31) "छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. जन्माच्या फेरीत सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत हे अढळ आहे"
32) "प्रेमामुळे मी माझ्या आप्त-नातलगांना सोडले नाही, तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकांस सोडण्यास भाग पाडेल."
33) "ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून तिच्या उदरी मला जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि ती माझ्या बाबतीत आता कुठे आहे?"
34) "पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र येऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो."
35) "ढग जसे एकमेकांच्या जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास व वियोग मानतो."
36) "आणि ज्याअर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करुन हे जग चालले आहे, त्याअर्थी भितीदायक असणाऱ्या संयोगकाळात हे माझे, ते माझे असे मानणे बरोबर नाही."
37) "आणि म्हणून ज्याअर्थी हे सत्य आहे त्याअर्थी हे माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करु नकोस. तू परत जा. जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये."
38) "माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तुच्या लोकांना जाऊन सांग की, सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडून द्या आणि त्याचा निर्धार ऐका."
39) स्वामी आणि सेवक यांच्यातील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले.
40) लांब व सडपातळ बोटे असलेला हात, ज्यावर स्वस्तिकाचे पवित्र चिन्ह आणि ज्यांचे तळवे मध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याला पाठीवर थोपटले आणि आपल्या एखाद्या मित्राप्रमाणे तो त्याला म्हणाला:
41) "अश्रू ढाळू नकोस कंठका, आवर ते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल."
42) त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काषाय वस्रांना नमन केले.
43) कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला.
44) अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्रांनिशी ऋषिवनाकडे जाणाऱ्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरुन मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला.
45) छन्न पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहुंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाला.
46) परतीच्या मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, काही वेळा चालताना अडखळायचा व काही वेळा जमिनीवर पडत होता, आणि अशा रीतीने जात असताना स्वामीभक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की, आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते.
2) शेवटी ते अनोमा नदीच्या तीरावर येऊन पोहचले.
3) तेव्हा छन्नाकडे वळून गौतम म्हणाला: "मित्रा, माझ्या पाठोपाठ येण्याने तुझी माझ्यावरील निष्ठा स्पष्ट झाली आहे. तुझ्या माझ्यासाठीच्या आपलेपणाने व प्रेमाने तू माझे ह्रदय जिंकले आहेस."
4) "तुला कोणतेही बक्षीस देण्यास मी जरी असमर्थ असलो तरी माझ्याविषयीच्या तुझ्या उदात्त भावनांनी मला संतोष झाला आहे."
5) "ज्यांच्याकडून आपणाला लाभ होणार आहे, त्याच्याबद्दल आपुलकी कोण दाखविणार नाही? पण चांगली वेळ निघून गेली की, आपली वाटणारी माणसेदेखील सहसा परक्यासारखी वागतात."
6) "कुटुंब पोषणासाठी पुत्राला लहानाचे मोठे केले जाते. पित्याचा सन्मान पुत्र करतो तो त्याच्या भावी आधारासाठी. जग आशेसाठी माया करते. काही एक हेतुशिवाय निःस्वार्थीपणा असे काही नसते."
7) "तूच एक याला अपवाद आहेस. आता हा घोडा घे आणि परत जा."
8 ) "महाराज जरी आपल्या प्रेमळ आत्मविश्वासामुळे अद्याप डळमळले नसले तरी ते आपले दुःख आतल्या आत गिळण्याची पराकाष्ठा करीत असतील."
9) "त्यांना सांग की, मी त्यांना सोडून आलो तो स्वर्गप्राप्तीच्या तृष्णेमुळे किंवा त्यांच्यावरील प्रेमाच्या अभावामुळे अथवा काही रागामुळे नाही."
10) "घर सोडून अशा रीतीने मी निघून जात असलो तरी माझ्याबद्दल शोक करण्याचा विचार त्यांनी करु नये. सहवास हा कितीही दीर्घ काळ टिकला तरी काही कालावधीने त्याचा शेवट हा होतोच."
11) "जर वियोग अटळ आहे तर स्वजनांपासून दुरावण्याचे अनेक प्रसंग वारंवार कसे येणार नाहीत?"
12) "माणसाच्या मरणसमयी त्याच्या संपत्तीचा निःसंशय वारसाहक्क सांगणारे लोक असतात. परंतु त्याच्या सद्गुणाचे वारस जगात सापडणे कठीण असते. किंबहुना ते नसतातच."
13) "महाराजांची, माझ्या पिताजींची - सेवा -सुश्रुषा होणे अगत्याचे आहे. महाराज म्हणतील की, 'मी अवेळी निघून गेलो.' पण कर्तव्यासाठी कधीच अयोग्य वेळ नसते."
14) "ह्या आणि अशाच शब्दात मित्रा, महाराजांना सांग आणि जेणेकरुन ते माझी आठवणही करणार नाहीत असाच प्रयत्न करीत रहा."
15) "आणि होय, माझ्या मातेलाही पुन्हा पुन्हा सांग की, तिच्या वात्सल्यप्रेमाला मी किती तरी अपात्र आहे. ती फार महान स्त्री आहे. तिची थोरवी शब्दात सांगता येण्यासारखी नाही."
16) हे शब्द ऐकून शोकाकुल झालेला छन्न हात जोडून भावनातिरेकाने कंठ दाटून येऊन उत्तरला,
17) "स्वामी, चिखलाने भरलेल्या नदीच्या पात्रात हत्ती जसा रुतून बसावा तशी तुम्ही तुमच्या आप्तांना ज्या मानसिक वेदना देत आहात ते पाहून माझ्या मनाची स्थिती होत आहे."
18) "तुमच्यासारखा निग्रह पाहून एखाद्याचे अंतःकरण लोखंडासारखे कठीण असले तरी कोणाच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही? ज्यांचे अंतःकरण प्रेमाने उंचबळले आहे त्यांची तर गोष्टच बोलावयास नको."
19) "कुठे तुमचा तो प्रासादात लोळणाऱ्या शरीराचा नाजूकपणा आणि कुठे कठीण कुशाग्रांनी भरलेली तपस्व्यांच्या अरण्यातील ती भूमी!"
20) "हे राजपुत्रा, तुझा हा निर्णय माहीत असताना हा घोडा घेऊन कपिलवस्तू नगरीला दुःखात लोटण्यास मी आपणहून कसा जाऊ?"
21) "एखादा धर्मनिष्ठ माणूस आपल्या सद्धर्माला सोडून देईल काय? त्याच प्रमाने स्वतःच्या मुलासाठी सतत झटणाऱ्या आपल्या वयोवृद्ध पित्याला सोडून तू जाणार काय?"
22) "आणि तुझी आई जिने तुला लहानाचा मोठे करण्यात खस्ता खाल्ल्या, तिला एखादा कृतघ्न माणूस आपल्या उपकारकर्त्याला विसरतो तसा तू सोडून जाणार काय?"
23) "जी सदगुणांची खाण आहे, जिच्यामुळे कुटुंबाची किर्ती वाढली आहे, जी पतीस समर्पित असून जिने नुकताच एका बालकाला जन्म दिला आहे अशा तुझ्या त्या पत्नीचा तू त्याग करणार काय?"
24) "धर्म आणि कीर्तीच्या चाहत्यांना सर्वश्रेष्ठ असणारा तू, एखाद्या निगरगट्ट उधळ्या माणसाने स्वतःचे मौल्यवान धन उधळून टाकावे तसे, ज्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच अशा यशोधरेच्या त्या लहानग्या बाळाला सोडून जाणार काय?"
25) "आणि तू तुझे आप्त, नातलग व राज्य सोडून जाण्याचा जरी निर्धार केला असलास तरी हे अन्नदात्या तू मला सोडून जाणार नाहीस असा मला विश्वास आहे. कारण तुझे पाय हेच माझे आश्रयस्थान आहे."
26) "अशा प्रकारे माझे अंतःकरण होरपळून निघत असताना तुला असा एकटा अरण्यात मागे टाकून मी परत नगराकडे जाऊच शकत नाही."
27) "तुझ्याशिवाय मी नगरात परतल्यावर महाराज मला काय म्हणतील? आणि कुशल वर्तमान म्हणून मी तुझ्या पत्नीला काय सांगू?"
28) "राजाजवळ माझी बदनामी पुन्हा पुन्हा कर असे तू सांगतोस. पण ते कोण खरे मानील? आणि जीभ टाळ्याला चिकटवून तसे बोलण्याचा मी प्रयत्न केला तरी महाराजांना ते पटणार नाही."
29) "जो नेहमी प्रेमळ आहे आणि जो दुसऱ्यावर दया करण्यास कधीही विसरत नाही अशा माणसाला, आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीस सोडून जाणे मुळीच शोभणारे नाही. म्हणून मागे फिर आणि माझ्यावर दया कर!"
30) दुःखाकुल छन्नाचे ते शब्द ऐकून अगदी हळुवारपणे सिद्धार्थ गौतमाने म्हटले:
31) "छन्ना, माझ्या वियोगाचे दुःख सोडून दे. जन्माच्या फेरीत सापडलेल्या प्राण्यांच्या बाबतीत हे अढळ आहे"
32) "प्रेमामुळे मी माझ्या आप्त-नातलगांना सोडले नाही, तरी मृत्यू आम्हाला अगतिकपणे एकमेकांस सोडण्यास भाग पाडेल."
33) "ती माझी आई जिने मला अनंत वेदना सोसून तिच्या उदरी मला जन्म दिला तिच्या बाबतीत मी कुठे आहे आणि ती माझ्या बाबतीत आता कुठे आहे?"
34) "पक्षी जसे आपल्या निवाऱ्यासाठी झाडावर एकत्र येऊन बसतात आणि नंतर एकमेकांपासून दूर जातात तसे प्राणीमात्रांच्या सहवासाचा शेवट न चुकता वियोगातच होतो."
35) "ढग जसे एकमेकांच्या जवळ येऊन पुन्हा दूर दूर जातात तसाच मी प्राणीमात्रांचा सहवास व वियोग मानतो."
36) "आणि ज्याअर्थी एक दुसऱ्याची फसवणूक करुन हे जग चालले आहे, त्याअर्थी भितीदायक असणाऱ्या संयोगकाळात हे माझे, ते माझे असे मानणे बरोबर नाही."
37) "आणि म्हणून ज्याअर्थी हे सत्य आहे त्याअर्थी हे माझ्या भल्या मित्रा, तू दुःख करु नकोस. तू परत जा. जर तुझ्या प्रेमामुळे तू घोटाळत असशील तर तू आधी जा आणि नंतर परत ये."
38) "माझ्याबद्दल वाईट न बोलता कपिलवस्तुच्या लोकांना जाऊन सांग की, सिद्धार्थावर प्रेम करण्याचे सोडून द्या आणि त्याचा निर्धार ऐका."
39) स्वामी आणि सेवक यांच्यातील हा संवाद ऐकून त्या उमद्या कंठक घोड्याने आपल्या जिभेने सिद्धार्थाचे पाय चाटले आणि टपटप उष्ण अश्रू ढाळले.
40) लांब व सडपातळ बोटे असलेला हात, ज्यावर स्वस्तिकाचे पवित्र चिन्ह आणि ज्यांचे तळवे मध्ये खोलगट होते अशा आपल्या हाताने गौतमाने कंठक घोड्याला पाठीवर थोपटले आणि आपल्या एखाद्या मित्राप्रमाणे तो त्याला म्हणाला:
41) "अश्रू ढाळू नकोस कंठका, आवर ते अश्रू. तुझ्या कष्टाचे तुला लवकरच फळ मिळेल."
42) त्यानंतर छन्नाने आपल्या मार्गाला लागण्याची वेळ आली आहे हे जाणून ताबडतोब गौतमाच्या काषाय वस्रांना नमन केले.
43) कंठक आणि छन्न यांचा निरोप घेऊन गौतम आपल्या मार्गाने जाऊ लागला.
44) अशा रीतीने स्वतःच्या राज्याची तमा न बाळगता हलक्या वस्रांनिशी ऋषिवनाकडे जाणाऱ्या मालकाला पाहून त्या छन्नाने आपले बाहू पसरुन मोठा आक्रोश केला व तो जमिनीवर लोळू लागला.
45) छन्न पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत मोठमोठ्याने रडू लागला. आपल्या बाहुंनी कंठक घोड्याला कुरवाळू लागला आणि अशा रीतीने निराशेने सारखा दुःख करीत तो परत जाण्यासाठी आपल्या प्रवासाला निघाला.
46) परतीच्या मार्गात तो काही वेळा आपल्याशीच विचार करीत राही, काही वेळा चालताना अडखळायचा व काही वेळा जमिनीवर पडत होता, आणि अशा रीतीने जात असताना स्वामीभक्तीने विदग्ध झालेला तो छन्न रस्त्यावर अशा काही गोष्टी करीत होता की, आपण काय करीत आहोत याचे त्याला भानच राहिले नव्हते.
🌷☘🌿🌸🌷🌸🌿☘🌷
***********************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात: २०. छन्न परतला
*********************
Comments
Post a Comment