1. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे धम्म नाही
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?
*************************
1. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे धम्म नाही
Belief in Supernatural is Not Dhamma
************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग चवथा- धम्म म्हणजे काय नाही?
Part IV- What is Not- Dhamma?
*************************
1. दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवणे म्हणजे धम्म नाही
Belief in Supernatural is Not Dhamma
************************
1) जेव्हा जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा ती कशी घडली, त्याचे कारण काय आहे हे जाणण्याची मनुष्यमात्राला आवश्यकता वाटते.
2) कधीकधी कारण व कार्य ही एकमेकांच्या इतकी जवळजवळ असतात की, कार्याच्या कारणाचा पत्ता लागणे अवघड नसते.
3) परंतु कधीकधी कार्य (परिणाम) हे कारणापासून इतके दूर असते की, तेथे कार्यकारणाचा शोध लागत नाही. ढोबळ दृष्टीने पाहता असे वाटते की या परिणामाला कारणच नव्हते.
4) तेव्हा असा प्रश्न उत्पन्न होतो की: ही घटना घडली कशी?
5) अशा वेळी सर्वसामान्य उत्तर असे असते की, *ही घटना काही तरी दैवी कारणाने (supernatural cause) म्हणजे चमत्काराने घडली असावी.*
6) भगवान बुद्धांच्या पूर्वजांनी ह्या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर दिले आहे.
7) *पकूद कच्चान* हा प्रत्येक घटनेला कारण असल्याचे मानीत नसे. तो म्हणत असे, *घटना कारणाविना स्वतंत्रपणे घडत असतात.*
8) *मक्खली घोसाल* मानीत असे की, *घटनेला कारण असले पाहिजे.* परंतु तो असा प्रचार करीत असे की, *ते कारण मानवी शक्तीबाहेर कुठे तरी 'प्रकृती', 'अनिवार्य आवश्यकता', 'वस्तूजातातील अंतर्गत नियम', 'पूर्वनियोजित दैव' अशांसारख्या गोष्टींत शोधले पाहिजे.*
9) भगवान बुद्धाने अशा सिद्धांताचे खंडण केले. त्यांचे म्हणणे असे की, *प्रत्येक घटनेला कारण असते. एवढेच नव्हे तर प्रत्येक कारण हेही मानवी अथवा प्राकृतिक कारणांचा, नियमांचा परिणाम आहे.*
10) काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता इत्यादींना कोणत्याही घटनेचे कारण मानणे ह्याला बुद्धाचा विरोध होता.
11) जर काळ, प्रकृती, अनिवार्य आवश्यकता हीच फक्त घटनेची एकमात्र कारणे असतील तर मग आमची स्थिती काय?
12) मनुष्य हा काळ, प्रकृती, आकस्मिकता, ईश्वर, दैव, अनिवार्य आवश्यकता यांच्या हातातील एक बाहुले आहे काय?
13) जर मनुष्य स्वतंत्र नाही तर माणसाच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय? *तो जर दैवी चमत्कृतीवर विश्वास ठेवू लागला तर त्याच्या बुद्धीचा उपयोग काय?*
14) *जर मनुष्य स्वतंत्र असेल तर प्रत्येक घटनेला मानवी प्राकृतिक कारण असले पाहिजे.* कोणत्याही घटनेचा दैवी चमत्कृतीत उगम असणे शक्य नाही.
15) कदाचित हे संभवनीय आहे की, एखाद्या घटनेचे वास्तविक कारण सापडत नसेल, परंतु जर तो बुद्धिमान असेल तर कधीतरी एके दिवशी ते कारण त्याला सापडल्याशिवाय राहणार नाही.
16) दैवी चमत्कृतीवादाचे खंडन करण्यात भगवान बुद्धांचे *तीन हेतू* होते.
17) त्यांचा पहिला हेतू *माणसाला बुद्धिवादी बनविणे.* (to lead man to the path of rationalism)
18) त्यांचा दुसरा हेतू *माणसाला स्वतंत्रतापूर्वक सत्याचा शोध लावण्यासाठी सिद्ध करणे.*
19) त्याचा तिसरा हेतू *ज्या भ्रामक समजुती माणसाची शोध करण्याची प्रवृत्ती मारतात त्यांचे उगमस्थान नष्ट करणे.*
(to remove the most potent source of superstition, the result of which is to kill the spirit of inquiry)
20) यालाच बुद्ध धम्माचा *कम्मसिद्धांत* अथवा *हेतूवाद* म्हणतात. (Law of Kamma or Causation)
21) *हा हेतूवाद बुद्ध धम्माचा केंद्रवर्ती सिद्धांत आहे. तो बुद्धीवाद शिकवितो आणि बुद्ध धम्म बुद्धिवादापेक्षा वेगळा नाही.*
22) याच कारणास्तव दैवी चमत्कृतीची पूजा म्हणजे धम्म नाही.
Comments
Post a Comment