1. मनाची मलिनता दूर करणे
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग एक- सद्धम्माची कार्ये
*************************
1. मनाची मलिनता दूर करणे
To Cleanse the Mind of its Impurities
************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग एक- सद्धम्माची कार्ये
*************************
1. मनाची मलिनता दूर करणे
To Cleanse the Mind of its Impurities
************************
1) एकदा तथागत हे श्रावस्तीस असताना कोसलराजा प्रसेनजित त्यांच्या निवासस्थानी आला आणि आपल्या रथातून उतरून अत्यंत आदराने व श्रद्धेने तो तथागतांकडे गेला.
2) सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धांचे सर्वोत्तम दर्शन घडावे व त्यांचा धर्मसिद्धांत कळावा हा होता.
3) तथागत बुद्धांनी त्याचे आमंत्रण स्वीकाराले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व शिष्य-संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले.
4) भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतृसमूहासमोर त्यांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला.
5) या वेळी त्या श्रोतृवृंदात दोन व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते.
6) त्यांपैकी एक मनात विचार करू लागला, "असल्या धर्म-सिद्धान्ताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते; किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे!"
7) दुसऱ्याच्या मनात विचार आला, "असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे!"
8). "गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गाईच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते; त्याप्रमाणे तथागत बुद्ध ह्या राजामागून जात आहे."
ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे ते एकत्र आले.
9) मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चतुर्दिकपालांनी संयमित आणि संरक्षित ठेवला.
10) उलट दुसरा मात्र पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला.
11) दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापाऱ्यांच्या गाड्या बाहेर पडत असताना सारथ्यांना तो न दिसल्याने रस्त्यावर पडलेला व्यापारी चिरडला गेला आणि मरण पावला.
12) पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना, त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले.
13) त्यानंतर आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो तथागत बुद्धांकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले.
14) त्या वेळी विश्ववंदनीय बुद्धांनी त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले:-
15) *"मन सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे."*
16) *"मनात दुष्ट, चुकीचे विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्ये ही वाईट बनतात. पापोद्भव दुःखे, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात."*
17) "मन हे सर्वांचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते."
18) *"मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात, आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख, पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते."*
19) हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धांची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे शिष्य झाले.
2) सकाळी नगरात प्रवेश करून आपले आदरातिथ्य स्वीकारावे असे त्याने तथागताला विनविले. यामध्ये त्याचा हेतू लोकांना भगवान बुद्धांचे सर्वोत्तम दर्शन घडावे व त्यांचा धर्मसिद्धांत कळावा हा होता.
3) तथागत बुद्धांनी त्याचे आमंत्रण स्वीकाराले. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या सर्व शिष्य-संघासह नगरात प्रवेश केला आणि चौरस्ते ओलांडून पूर्वनियोजित स्थानी येऊन विराजमान झाले.
4) भोजन संपल्यानंतर राजाच्या विनंतीनुसार चौरस्त्यावर एका मोठ्या श्रोतृसमूहासमोर त्यांनी धर्मोपदेशाला प्रारंभ केला.
5) या वेळी त्या श्रोतृवृंदात दोन व्यापारी त्यांचे भाषण ऐकत होते.
6) त्यांपैकी एक मनात विचार करू लागला, "असल्या धर्म-सिद्धान्ताचा उपदेश सार्वजनिक रीतीने घडवून आणावा यात राजाचे किती थोर शहाणपण दिसते; किती सर्वव्यापी व शोधक बुद्धीचे सिद्धांत आहेत हे!"
7) दुसऱ्याच्या मनात विचार आला, "असल्या माणसाला धर्मोपदेश करायला येथे आणणे यात राजाचा किती मूर्खपणा आहे!"
8). "गाय जे वाहन ओढीत असते त्याला बांधलेले वासरू गाईच्या मागून जाते आणि जात असताना हंबरत असते; त्याप्रमाणे तथागत बुद्ध ह्या राजामागून जात आहे."
ते नगर सोडल्यानंतर ते दोघे व्यापारी ज्या सराईमध्ये उतरले होते तेथे ते एकत्र आले.
9) मद्यपान करीत असताना जो व्यापारी भला होता त्याला चतुर्दिकपालांनी संयमित आणि संरक्षित ठेवला.
10) उलट दुसरा मात्र पिसाळल्याप्रमाणे एकसारखा पीत होता. शेवटी झोप आल्याने तो गुत्त्याच्या जवळच्या रस्त्यावर पहुडला.
11) दुसऱ्या दिवशी सकाळी व्यापाऱ्यांच्या गाड्या बाहेर पडत असताना सारथ्यांना तो न दिसल्याने रस्त्यावर पडलेला व्यापारी चिरडला गेला आणि मरण पावला.
12) पहिला व्यापारी एका दूर देशात आला असताना, त्या देशाच्या एका पवित्र अश्वाने त्याच्यापुढे गुडघा वाकविल्यामुळे तो त्या देशाचा राजा म्हणून निवडला गेला आणि त्याला सिंहासनाधिष्ठित करण्यात आले.
13) त्यानंतर आपल्या जीवनाला मिळालेली ही विलक्षण कलाटणी मनात आणून तो तथागत बुद्धांकडे गेला आणि आपल्या देशात येऊन आपल्या प्रजेला उपदेश करण्यासाठी त्यांना आमंत्रण दिले.
14) त्या वेळी विश्ववंदनीय बुद्धांनी त्या दुष्टबुद्धी व्यापाऱ्याच्या मृत्यूचे आणि त्या सद्बुद्धी व्यापाऱ्याच्या भरभराटीचे कारण त्यांना सांगितले आणि म्हटले:-
15) *"मन सर्वांचे मूळ आहे, मन हे स्वामी आहे. मन हे कारण आहे."*
16) *"मनात दुष्ट, चुकीचे विचार असतील तर माणसाचे विचार, माणसाचे शब्द आणि कार्ये ही वाईट बनतात. पापोद्भव दुःखे, ज्याप्रमाणे रथाची चाके रथाच्या घोड्यामागे जातात त्याप्रमाणे त्याचा पाठपुरावा करीत असतात."*
17) "मन हे सर्वांचे मूळ आहे. तेच आज्ञा करते आणि तेच घटना घडवून आणते."
18) *"मनात सद्विचार असतील तर त्या माणसाचे शब्द आणि कार्ये दोन्हीही चांगली असतात, आणि अशा सदाचारापासून उद्भवणारे सुख, पदार्थाच्या सावलीप्रमाणे सदोदित त्या माणसामागे जात असते."*
19) हे शब्द ऐकून राजा, त्याचे प्रधान आणि इतर असंख्य लोकांनी भगवान बुद्धांची धम्मदीक्षा ग्रहण केली आणि ते त्यांचे शिष्य झाले.
Comments
Post a Comment