1. बुद्धांचे समकालीन
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
*********************
भाग सहावा- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
The Buddha and His Contemporaries
The Buddha and His Contemporaries
*********************
1. बुद्धांचे समकालीन
His Contemporaries
*************************
1) ज्या काळात बुद्धांनी परिव्रज्या घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राम्हणी तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानांचे बासष्ट पंथ त्या वेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राम्हणी तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते.
1. बुद्धांचे समकालीन
His Contemporaries
*************************
1) ज्या काळात बुद्धांनी परिव्रज्या घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली होती. ब्राम्हणी तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानांचे बासष्ट पंथ त्या वेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राम्हणी तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते.
2) या पंथापैकी एक पंथ पूर्ण काश्यप (Purana Kassappa) याच्या नेतृत्वाखाली होता. त्याच्या तत्त्वज्ञानाला "अक्रियावाद" असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की, कर्माचा आत्म्यावर काहीही परिणाम होत नाही. कुणीही स्वतः काही काम करावे किंवा दुसऱ्याकडून ते करवून घ्यावे. स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्या कडून ती करवून घ्यावी. कुणी स्वतः चोरी किंवा दरोडेखोरी करावी किंवा दुसऱ्याकडून करवून घ्यावी. स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करवावा. स्वतः खोटे बोलावे किवा दुसऱ्याला खोटे बोलावयास लावावे. आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरीही त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावर कशाचीच क्रिया होत नाही. ज्यावेळी मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरुपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही. शरीर राहात नाही आणि आत्माही राहात नाही.
3) दुसऱ्या एका पंथाचे नाव "नियतिवाद" असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मक्खली घोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किवा निश्चयवाद होता. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडवू शकत नाही. घटना घडतात, त्या कोणीही घडवित नाही. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमी करता येत नाही. जगाच्या अनुभवाचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे, हे त्याचे तत्त्वज्ञान होते.
4) तिसऱ्या पंथाचे नाव "उच्छेदवाद" असे होते. अजित केशकंबल हा त्याचा मुख्य प्रणेता होय. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा "विनाशवाद" होय. यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही, आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्त्वांपासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाळू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. महाकल्पातील जन्ममरणाच्या चौऱ्यांशी लक्ष फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतरच आत्म्याच्या दुःखाचा अन्त होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही होणार नाही.
5) चवथ्या पंथाचे नाव "अन्योन्यवाद " असे होते. या पंथाचा प्रमुख पकुध कच्चायन हा होता. त्याचे म्हणणे असे की, जीव हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यांपैकी कोणतेही दुसऱ्यावर अवलंबून नसते. त्यांचा एकमेकांवर परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहेत. त्यांचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शरीर सप्तमहाभूतांत प्रवेश करते, एवढाच त्याचा अर्थ समजावयाचा.
6) संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव विक्षेपवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, "जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन. पण तो नाही असे मला वाटले तर मी नाही म्हणेन. मानवप्राणी निर्माण केले गेले काय, माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्याची फळे भोगावी लागतात काय आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईल. कारण त्याचे अस्तित्व आहे असे मला वाटत नाही." याप्रमाणे संजय बेलपुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले.
7) सहाव्या पंथाचे नाव "चातुर्यामसंवरवाद." या पंथाचे प्रमुख महावीर. हे गौतम बुद्ध नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होते. त्यांना निगंठ नाथपुत्त म्हणत. महावीरांनी असे सांगितले की, पूर्वजन्मीच्या आणि या जन्मीच्या दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दृष्कर्मांपासून मुक्त व्हावे असे त्यांनी सुचविले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे महावीरांनी सांगितले. ते नियम पुढीलप्रमाणे:
1) हिंसा न करणे
2) चोरी न करणे
3) खोटे न बोलणे
4) मालमत्ता संपादन न करणे व ब्रम्हचर्य पाळणे
Comments
Post a Comment