1. संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग तिसरा- बुद्धांच्या धम्माचे टीकाकार
Part III- Critics of His Doctrines
*************************
1. संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार
Critics of Open Admission to the Sangh
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग तिसरा- बुद्धांच्या धम्माचे टीकाकार
Part III- Critics of His Doctrines
*************************
1. संघातील मुक्त प्रवेशाचे टीकाकार
Critics of Open Admission to the Sangh
*************************
1) कोणत्याही उपासक गृहस्थाला सदस्य म्हणून स्वीकृत करणे संघाला सुलभ होते.
2) संघरुपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत.
3) त्यांचे म्हणणे असे होते की, अशा योजनेमुळे असे घडेल की, काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील, "ह्या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे."
4) ही टीका यथातथ्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता.
5) तथागतांचे म्हणणे होते की, हा धर्म स्थापून, उपकारक अशा मुक्तीजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता: सद्धम्माचा जलाशय.
6) तथागतांची इच्छा होती की, पापाच्या कलंकांनी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील.
7) आणि जर कोणी ह्या सद्धम्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर, त्याबद्दल तोच दोषी आहे, सद्धम्म नव्हे.
8). तथागत म्हणाले, "लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले, 'जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये. ज्यांची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे,' तर ते योग्य ठरेल काय?"
9) "अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सद्धम्माचा उपयोग तो काय होता?"
10) "आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती, हे टीकाकार विसरले होते. *आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पाहावा यासाठी सर्वांना खुला असावा* अशी त्यांची इच्छा होती.
2) संघरुपी मंदिराचे द्वार खुले ठेवून त्यात कुणालाही प्रवेश करू दिल्याबद्दल भगवान बुद्धांवर काही लोक टीका करीत असत.
3) त्यांचे म्हणणे असे होते की, अशा योजनेमुळे असे घडेल की, काही लोकांना संघात प्रवेश मिळाल्यानंतर संघ सोडून ते पुन्हा गृहस्थाश्रमात जातील आणि ह्या त्यांच्या माघारीमुळे लोक असे म्हणू लागतील, "ह्या लोकांनी व्यक्त केलेला श्रमण गौतमाचा धर्म फोल असला पाहिजे."
4) ही टीका यथातथ्य नव्हती. ज्या हेतूने तथागतांनी अशी योजना केली होती तो हेतू टीकाकारांना समजला नव्हता.
5) तथागतांचे म्हणणे होते की, हा धर्म स्थापून, उपकारक अशा मुक्तीजलाने परिपूर्ण व स्नानासाठी योग्य असा जलाशय त्यांनी निर्माण केला होता: सद्धम्माचा जलाशय.
6) तथागतांची इच्छा होती की, पापाच्या कलंकांनी जर कोणी भ्रष्ट झाला असेल तर ह्या जलाशयात त्याने स्नान केल्याने त्याची पापे धुवून जातील.
7) आणि जर कोणी ह्या सद्धम्माच्या जलाशयाकडे गेला आणि स्नान न करताच पूर्वीप्रमाणे कलंकित अवस्थेत मागे फिरला तर, त्याबद्दल तोच दोषी आहे, सद्धम्म नव्हे.
8). तथागत म्हणाले, "लोकांना आपली पापे धुवून टाकणे साध्य व्हावे म्हणून हा जलाशय निर्माण केल्यानंतर जर मी असे म्हटले, 'जो कोणी मलिन आहे त्याने जलाशयात प्रवेश करू नये. ज्यांची धूळ आणि चिखल धुवून गेला आहे व जे शुद्ध व निष्कलंक आहेत त्यांनीच फक्त जलाशयाकडे जावे,' तर ते योग्य ठरेल काय?"
9) "अशा अटी घातल्या असत्या तर माझ्या सद्धम्माचा उपयोग तो काय होता?"
10) "आपल्या धम्माने होणारे हित हे फक्त निवडक लोकांपुरतेच मर्यादित करावे ही तथागतांची इच्छा नव्हती, हे टीकाकार विसरले होते. *आपला धम्म हा सर्वांनी पडताळून पाहावा यासाठी सर्वांना खुला असावा* अशी त्यांची इच्छा होती.
Comments
Post a Comment