1. वैशालीला अखेरचा निरोप
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग दुसरा - वैशालीचा निरोप
Part II- Leaving Vesali
*************************
1. वैशालीला अखेरचा निरोप
Farewell to Vesali
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग दुसरा - वैशालीचा निरोप
Part II- Leaving Vesali
*************************
1. वैशालीला अखेरचा निरोप
Farewell to Vesali
*************************
1) आपल्या अंतिम प्रवासास निघण्यापूर्वी तथागत बुद्ध राजगृही गृध्रकूट पर्वतावर राहत होते.
2) तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, "आनंद, चल आपण अम्बलठ्ठिकेला जाऊया."
3) "जशी आपली आज्ञा," आनंद सम्मतिदर्शक स्वरात म्हणाला. महाभिक्खूसंघ सोबत घेऊन ते अम्बलठ्ठिकेला गेले.
4) काही काळ अम्बलठ्ठिकेला वास्तव्य करुन ते नालंदाला गेले.
5) नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटलीगामास गेले.
6) पाटलाग्रामाहुन कोटिगामाला आणि कोटिग्रामाहून नादिका येथे ते गेले.
7) ह्या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली.
8). नादिकेहून ते वैशालीस गेले.
9) वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते. आणि म्हणूनच जैनधर्माचा तो एक दुर्गही होता.
10) तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यात बुद्ध यशस्वी झाले.
11) असे सांगतात की, अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की, त्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले.
12) वैशालीच्या जनतेने सभा बोलावून त्याबद्दल तक्रार केली.
13) पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी तथागत बुद्धांना नगरास येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला.
14) महाली नावाचा वैशालीचा एक लिच्छवी जो बिंबिसार राजाचा मित्र व पुरोहितपुत्र होता, त्याला निमंत्रण देण्यासाठी पाठविण्यात आले.
15) तथागत बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व पाचशे भिक्खूंसह ते निघाले. वज्जियांच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच गडगडाटासह वादळ होऊन मुसळधार पावसाचा वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली.
16) वैशालीच्या जनतेने तथागत बुद्धांचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय.
17) तथागत बुद्धांनी त्यांची ह्रदये जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला.
18) नंतर वर्षावासाचा समय आला. तथागत बुद्ध वर्षावासासाठी वेळुवनात गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले.
19) वर्षावासानंतर तथागत पुन्हा वैशालीला आले. कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासास जाण्याचे त्यांनी योजिले होते.
20) एके दिवशी तथागत बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले. मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टीक्षेप टाकून त्यांनी आनंदास सांगितले, "आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टिभेट आहे."
21) असे म्हणून त्यांनी वैशालीजनांचा निरोप घेतला.
22) त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला, तेव्हा त्या लिच्छवीजनांना त्यांनी आपले भिक्षापात्र आठवण व स्मृतीचिन्ह म्हणून प्रदान केले.
23) ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुन्हा भेटीसाठी ते जगले नाहीत.
2) तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले, "आनंद, चल आपण अम्बलठ्ठिकेला जाऊया."
3) "जशी आपली आज्ञा," आनंद सम्मतिदर्शक स्वरात म्हणाला. महाभिक्खूसंघ सोबत घेऊन ते अम्बलठ्ठिकेला गेले.
4) काही काळ अम्बलठ्ठिकेला वास्तव्य करुन ते नालंदाला गेले.
5) नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटलीगामास गेले.
6) पाटलाग्रामाहुन कोटिगामाला आणि कोटिग्रामाहून नादिका येथे ते गेले.
7) ह्या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली.
8). नादिकेहून ते वैशालीस गेले.
9) वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते. आणि म्हणूनच जैनधर्माचा तो एक दुर्गही होता.
10) तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यात बुद्ध यशस्वी झाले.
11) असे सांगतात की, अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला की, त्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले.
12) वैशालीच्या जनतेने सभा बोलावून त्याबद्दल तक्रार केली.
13) पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी तथागत बुद्धांना नगरास येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला.
14) महाली नावाचा वैशालीचा एक लिच्छवी जो बिंबिसार राजाचा मित्र व पुरोहितपुत्र होता, त्याला निमंत्रण देण्यासाठी पाठविण्यात आले.
15) तथागत बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व पाचशे भिक्खूंसह ते निघाले. वज्जियांच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच गडगडाटासह वादळ होऊन मुसळधार पावसाचा वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली.
16) वैशालीच्या जनतेने तथागत बुद्धांचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय.
17) तथागत बुद्धांनी त्यांची ह्रदये जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला.
18) नंतर वर्षावासाचा समय आला. तथागत बुद्ध वर्षावासासाठी वेळुवनात गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले.
19) वर्षावासानंतर तथागत पुन्हा वैशालीला आले. कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासास जाण्याचे त्यांनी योजिले होते.
20) एके दिवशी तथागत बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला. भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले. मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टीक्षेप टाकून त्यांनी आनंदास सांगितले, "आनंदा, वैशालीची ही माझी अखेरची दृष्टिभेट आहे."
21) असे म्हणून त्यांनी वैशालीजनांचा निरोप घेतला.
22) त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला, तेव्हा त्या लिच्छवीजनांना त्यांनी आपले भिक्षापात्र आठवण व स्मृतीचिन्ह म्हणून प्रदान केले.
23) ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती. त्यानंतर पुन्हा भेटीसाठी ते जगले नाहीत.
Comments
Post a Comment