1. त्यांचे दिसणे
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग पहिला - त्यांचे व्यक्तीमत्त्व
Part I- His Personality
*************************
1. त्यांचे दिसणे
His Personal Appearance
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
आठवा खंड- महामानव सिद्धार्थ गौतम
Book VIII- THE MAN WHO WAS SIDDHARTH GAUTAMA
*************************
भाग पहिला - त्यांचे व्यक्तीमत्त्व
Part I- His Personality
*************************
1. त्यांचे दिसणे
His Personal Appearance
*************************
1) त्यांच्या सर्वत्र वर्णनांवरुन असे कळते की, तथागत हे एक आकर्षक स्वरुपाचे, देखणे पुरुष होते.
2) त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तीमत्व आनंददायक होते.
3) त्यांचे आजानुबाहू व सिंहगती, त्यांचे वृषभसम नेत्र आणि सुवर्णकांती, त्यांची रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे.
4) त्यांच्या भुवया, कपाळ, तोंड, डोळे, देह, हात, पाय आणि त्यांची गती- त्यांचा जो जो देहविशेष कुणांच्या दृष्टिक्षेपात येई त्या अवयवांवर दृष्टी खिळून जाई.
5) ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्याच्यावर त्यांच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वात्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे.
6) त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा खिळून उभा राही, उभा असे तो त्यांच्यामागे चालू लागे, जो हळुहळू आणि शांतपणे चालत असेे तो जलद धावू लागे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही.
7) जे त्यांच्या दर्शनार्थ येत त्यापैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत, काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहपूर्ण शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत. कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे.
8). सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे.
9) स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण ऐकण्यास उत्सुक असत.
10) त्यांची वाणी (आवाज) अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे.
11) त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासनपूर्ण वाटे आणि त्यांचे रुप पाहणाऱ्यास आश्चर्य व आदर वाटे.
12) त्यांचे व्यक्तीमत्व, त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची ह्रदयदेवता होण्यासही पुरेसे होते.
13) जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत.
14) ते जे काही बोलत असो; पण ते बोलायचे तेव्हा ऐकणाऱ्यांंच्या भावना हेलावून जात आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळवली जात.
15) श्रोत्यांच्या मनात त्यांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे, तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होई.
16) त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांंना, गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दांत असल्याची जाणीव होई.
17) जेव्हा ते स्त्री-पुरुषांबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रुप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित व हर्षनिर्भर करीत असे.
18) डाकू अंगुलीमाल आणि आवळीचा नरमांसभक्षक ह्यांना धर्मदीक्षा देणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले असते काय? राजा प्रसेनजित व राणी मल्लिका ह्यांचे एका शब्दाने सख्य करुन देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय? कोणावर त्यांचा प्रभाव एकदा पडला की तो कायमचा त्यांचा होत असे. इतके त्यांचे व्यक्तीमत्व आकर्षक होते.
2) त्यांची देहाकृती ही सुवर्ण पर्वताच्या शिखराप्रमाणे होती. ते उंच आणि सुदृढ असून त्यांचे व्यक्तीमत्व आनंददायक होते.
3) त्यांचे आजानुबाहू व सिंहगती, त्यांचे वृषभसम नेत्र आणि सुवर्णकांती, त्यांची रुंद छाती सर्वांना आकर्षित करीत असे.
4) त्यांच्या भुवया, कपाळ, तोंड, डोळे, देह, हात, पाय आणि त्यांची गती- त्यांचा जो जो देहविशेष कुणांच्या दृष्टिक्षेपात येई त्या अवयवांवर दृष्टी खिळून जाई.
5) ज्याने कोणी त्यांना पाहिले असेल त्याच्यावर त्यांच्या तेजाचा, सामर्थ्याचा आणि त्यांच्या सर्वात्तम सौंदर्याचा प्रभाव पडत असे.
6) त्यांचे दर्शन होताच अन्यत्र जाणारा खिळून उभा राही, उभा असे तो त्यांच्यामागे चालू लागे, जो हळुहळू आणि शांतपणे चालत असेे तो जलद धावू लागे आणि जो बसलेला असे तो एकदम उभा राही.
7) जे त्यांच्या दर्शनार्थ येत त्यापैकी काही हात जोडून त्यांना अभिवादन करीत, काही आदराने नतमस्तक होत, काही स्नेहपूर्ण शब्दांनी त्यांच्याशी संभाषण करीत. कोणीही आदर व्यक्त केल्याशिवाय निरोप घेत नसे.
8). सर्वांना त्यांच्याबद्दल प्रेम आणि आदर वाटत असे.
9) स्त्रिया आणि पुरुष सर्व त्यांचे भाषण ऐकण्यास उत्सुक असत.
10) त्यांची वाणी (आवाज) अत्यंत मधुर, गंभीर, आकर्षक, कंपनात्मक आणि सुस्पष्ट अशी होती. त्यामुळे त्यांचे भाषण हे जणू दिव्य संगीतासारखे वाटायचे.
11) त्यांचा स्वर ऐकणाऱ्यास आश्वासनपूर्ण वाटे आणि त्यांचे रुप पाहणाऱ्यास आश्चर्य व आदर वाटे.
12) त्यांचे व्यक्तीमत्व, त्यांना लोकनेता होण्यासच नव्हे तर आपल्या अनुयायांची ह्रदयदेवता होण्यासही पुरेसे होते.
13) जेव्हा ते बोलत तेव्हा श्रोते सहजच जमत असत.
14) ते जे काही बोलत असो; पण ते बोलायचे तेव्हा ऐकणाऱ्यांंच्या भावना हेलावून जात आणि त्यांची मने आपल्या इच्छेप्रमाणे वळवली जात.
15) श्रोत्यांच्या मनात त्यांच्या शब्दांचा एवढा प्रभाव पडे की जे काही ते सांगत ते सत्य आहे एवढेच नव्हे, तर तो मुक्तीचा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होई.
16) त्यांचे भाषण ऐकणाऱ्यांंना, गुलामांना स्वतंत्र करण्याचे सामर्थ्य असणारे सत्य त्यांच्या शब्दांत असल्याची जाणीव होई.
17) जेव्हा ते स्त्री-पुरुषांबरोबर बोलत तेव्हा त्यांचे गंभीर रुप लोकांच्या मनात आदराची भावना निर्माण करीत असे आणि त्यांचा मधुर स्वर त्यांना आश्चर्यचकित व हर्षनिर्भर करीत असे.
18) डाकू अंगुलीमाल आणि आवळीचा नरमांसभक्षक ह्यांना धर्मदीक्षा देणे दुसऱ्या कोणाला साध्य झाले असते काय? राजा प्रसेनजित व राणी मल्लिका ह्यांचे एका शब्दाने सख्य करुन देणे दुसऱ्या कोणाला जमले असते काय? कोणावर त्यांचा प्रभाव एकदा पडला की तो कायमचा त्यांचा होत असे. इतके त्यांचे व्यक्तीमत्व आकर्षक होते.
Comments
Post a Comment