1. उपाली न्हाव्यास धम्मदीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग सहावा- कनिष्ठ आणि सामान्यजनांची धम्मदीक्षा
Conversion of the Low and the Lowly
*************************
1. उपाली न्हाव्यास धम्मदीक्षा
Conversion of Upali, the Barber
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग सहावा- कनिष्ठ आणि सामान्यजनांची धम्मदीक्षा
Conversion of the Low and the Lowly
*************************
1. उपाली न्हाव्यास धम्मदीक्षा
Conversion of Upali, the Barber
*************************
1) परत जात असताना उपाली न्हावी विचार करू लागला. "शाक्य हे भयंकर लोक आहेत. या अलंकारांसह मी परत गेलो तर मी माझ्या सोबत्यांना ठार मारले आणि त्यांचे अलंकार घेऊन पळालो असे समजून ते मला ठार मारतील. मग शाक्य कुळातील हे तरुण ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने मी का जाऊ नये?"
2) "खरोखरच मी का जाऊ नये?" उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकारांचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला टांगून तो म्हणाला, "ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे." आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला.
3) शाक्यांनी त्याला दुरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले, "उपाली, तू परत का आलास?"
4) तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, "उपाली, तू परत गेला नाहीस हे बरे केलेस; कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते."
5) आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली न्हाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवन्तांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतांस म्हणाले, "भगवन्त, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत. आणि हा उपाली न्हावी ब-याच दिवसांपासून आमची सेवा करीत आहे. भगवन्तांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे. म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू. म्हणजे अश्यारीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल."
6) तेव्हां तथागतांनी पहिल्या *प्रथम उपाली न्हाव्याला प्रवज्ज्या देऊन भिक्खू संघात सामील करुन घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना* भिक्खू संघाची दीक्षा दिली.
2) "खरोखरच मी का जाऊ नये?" उपालीने स्वतःलाच विचारले आणि ते अलंकारांचे गाठोडे पाठीवरून खाली उतरून एका झाडाला टांगून तो म्हणाला, "ज्याला हे सापडेल त्याने भेट म्हणून ते घेऊन जावे." आणि तो शाक्य तरुणांच्या मागोमाग जाण्यासाठी मागे फिरला.
3) शाक्यांनी त्याला दुरूनच येताना पाहिले आणि ते त्याला म्हणाले, "उपाली, तू परत का आलास?"
4) तेव्हा त्याने आपल्याला काय वाटले ते त्यांना सांगितले. त्यावर ते म्हणाले, "उपाली, तू परत गेला नाहीस हे बरे केलेस; कारण शाक्य हे भयंकर लोक आहेत आणि त्यांनी तुला ठार मारले असते."
5) आणि जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते उपाली न्हाव्याला बरोबर घेऊन गेले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी भगवन्तांना वंदन केले आणि ते एका बाजूला बसले. याप्रमाणे बसल्यावर ते तथागतांस म्हणाले, "भगवन्त, आम्ही शाक्य गर्विष्ठ आहोत. आणि हा उपाली न्हावी ब-याच दिवसांपासून आमची सेवा करीत आहे. भगवन्तांनी आमच्या अगोदर त्याला आपल्या भिक्खू संघात घ्यावे. म्हणजे त्याला आम्ही योग्य तो आदर आणि मान देऊ आणि आमच्यातील ज्येष्ठ म्हणून आम्ही त्याला हात जोडून वंदन करू. म्हणजे अश्यारीतीने आमच्यातील शाक्यत्वाचा गर्व नष्ट होईल."
6) तेव्हां तथागतांनी पहिल्या *प्रथम उपाली न्हाव्याला प्रवज्ज्या देऊन भिक्खू संघात सामील करुन घेतले आणि त्यानंतर त्या शाक्य कुळातील तरुणांना* भिक्खू संघाची दीक्षा दिली.
Comments
Post a Comment