1. भिक्षारुपी बंधन (भिक्षापाश)
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग चवथा- भिक्खू आणि सामान्य उपासक
Part IV- The Bhikkhu and the Laity
*************************
1. भिक्षारुपी बंधन (भिक्षापाश)
The Bond of Alms
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग चवथा- भिक्खू आणि सामान्य उपासक
Part IV- The Bhikkhu and the Laity
*************************
1. भिक्षारुपी बंधन (भिक्षापाश)
The Bond of Alms
*************************
1) संघ ही सुसंघटित संस्था असून त्याचे सभासदत्व सर्वांनाच मोकळे नव्हते. (Organised Body)
2) केवळ परिव्रज्या स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे.
3) उपसंपदा स्वीकारल्यानंतरच परिव्राजक संघसभासद बनत असे.
4) *संघ ही स्वतंत्र संस्था (independent body) होती. प्रत्यक्ष संस्थापकावरही ती अवलंबून नव्हती.*
5) संघ ही स्वायत्त संस्था (autonomous) असून आपल्याला आवडेल, योग्य वाटेल त्याला सभासदत्व देऊ शकत होती. विनय पिटकाच्या नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व काढून घेऊ शके.
6) *भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा.*
7) भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून होता. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक.
8). उपासकांची सुसंघटित (organised) अशी व्यवस्था नव्हती.
9) संघात कोणालाही प्रवेश देताना *संघदीक्षा* हा समारंभ करावा लागे.
10) संघदीक्षेमध्ये, *संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश* या दोहोंचा अंतर्भाव होई.
11) मात्र ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल, परंतु संघप्रवेश करावयाचा नसेल त्यांच्यासाठी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून गृहहीन बनणे.
12) धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्धधर्माचा -हास झाला, त्यांपैकी हे एक कारण आहे.
13) या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भटकायला मोकळा राहत असे, आणि *अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे.*
2) केवळ परिव्रज्या स्वीकारल्याने परिव्राजकाला संघाचे सभासदत्व लाभत नसे.
3) उपसंपदा स्वीकारल्यानंतरच परिव्राजक संघसभासद बनत असे.
4) *संघ ही स्वतंत्र संस्था (independent body) होती. प्रत्यक्ष संस्थापकावरही ती अवलंबून नव्हती.*
5) संघ ही स्वायत्त संस्था (autonomous) असून आपल्याला आवडेल, योग्य वाटेल त्याला सभासदत्व देऊ शकत होती. विनय पिटकाच्या नियमाला अनुसरून ती कोणाचेही सभासदत्व काढून घेऊ शके.
6) *भिक्खूला उपासकाशी जोडणारे एकच बंधन म्हणजे भिक्षा.*
7) भिक्खू हा भिक्षेवर अवलंबून होता. भिक्षा घालणारा म्हणजे उपासक.
8). उपासकांची सुसंघटित (organised) अशी व्यवस्था नव्हती.
9) संघात कोणालाही प्रवेश देताना *संघदीक्षा* हा समारंभ करावा लागे.
10) संघदीक्षेमध्ये, *संघप्रवेश त्याप्रमाणेच धम्मप्रवेश* या दोहोंचा अंतर्भाव होई.
11) मात्र ज्यांना धम्मप्रवेश हवा असेल, परंतु संघप्रवेश करावयाचा नसेल त्यांच्यासाठी वेगळी धम्मदीक्षा नसे. संघप्रवेश म्हणजे घर सोडून गृहहीन बनणे.
12) धम्म प्रवेशासाठी धम्मदीक्षा नसणे ही एक गंभीर उणीव होती. ज्या अनेक कारणांनी भारतात बौद्धधर्माचा -हास झाला, त्यांपैकी हे एक कारण आहे.
13) या दीक्षाविधीच्या अभावी उपासक एका धर्मातून दुसऱ्या धर्मात भटकायला मोकळा राहत असे, आणि *अधिक वाईट गोष्ट म्हणजे दोन धर्म एकाच वेळेला आचरण्याची त्याला मुभा मिळत असे.*
Comments
Post a Comment