1. राजकृपेवर अवलंबून राहू नका

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
VI (सहा)- बुद्धांची सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने
SECTION SIX-- SERMONS ON SOCIO-POLITICAL QUESTIONS
*************************
1. राजकृपेवर अवलंबून राहू नका
Do Not Depend on the Favour of Princes
***********************

1) एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनात कलंदक-निवासात राहात होते.

2) त्या वेळी भगवंतांविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता.

3) सकाळ-संध्याकाळ पाचशे गाड्यांतून देवदत्ताच्या शिष्यगणांना तो अन्नपात्रे पाठवित होता.

4) तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले आणि साभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी तथागतांना देवदत्तासंबंधाची वार्ता सांगितली.

5) तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, "राजाकडून कृपेची, खुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ-संध्याकाळ पाचशे गाड्यांत अन्नपात्रे भरून अन्न पुरवीत आहे तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात त्याच्या प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल."

6) "भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज चुरडून थापले तरी तो कुत्रा अधिकच पिसाळतो. त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोशीत आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीलाच जात राहणार; त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची खुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत."

7) "सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गांतील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत."

8). "म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकविले पाहिजे की, आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षाव होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू आणि त्यांचा वर्षाव होऊ लागलाच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हांला राजाचे दास बनवू देणार नाही."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म