1. धनवंतांसाठी विनय

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
पाचवा खंड- संघ
Book V- The Sangh
*************************
भाग पाचवा- उपासकांसाठी विनय
Part V- Vinaya for the Laity
*************************
1. धनवंतांसाठी विनय
Vinaya for the Wealthy
*************************
1. (i)

1) *दारिद्र्यात धन्यता मानावी असे तथागतांनी कधीही सांगितले नाही व दारिद्र्याचा गौरव केला नाही.*

2) *त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही.*

3) *उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असेच ते म्हणतात.* एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे *संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे.*

 

1. (ii)

1) एकदा अनाथपिंडिक तथागतांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसून म्हणाला, *"गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत?"*
(Things that are welcome, pleasant, agreeable, to the householder, but which are hard to gain?)

2) तथागतांनी उत्तर दिले, *"ह्या गोष्टींपैकी सन्मार्गाने धन संपादन करणे हे प्रथम आहे."*
(The first is to acquire wealth lawfully.)

3) "दुसरी गोष्ट म्हणजे, *आपले आप्तेष्टसुद्धा सन्मार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे."*
(To see that your relations also get their wealth lawfully.)

4) "तिसरी गोष्ट म्हणजे, *'दीर्घायुषी होणे.'"*
(To live long and reach great age.)

5) "या जगातील स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर अशा या तीन दुष्प्राप्य गोष्टी मिळविताना सद्गृहस्थाने *चार अटी* पाळल्या पाहिजेत. ह्या चार अटी म्हणजे *श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा* यांना प्राप्त करून संपन्न होणे."
(The blessing of faith, the blessing of virtuous conduct, the blessing of liberality, and the blessing of wisdom.)

6) श्रद्धारुपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागतासंबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. ह्या ज्ञानाने त्यांना हे तथागत अर्हत आहेत, सम्यक् संबुद्ध आहेत, विद्या व सदाचरणसंपन्न आहेत. विश्वाचे जाणकार आहेत. अतुलनीय आहेत, ते मनुष्यांना वळण लावणारे सारथी देवमनुष्याचे गुरू आहेत असे उमगले पाहिजे."

7) "सदाचाराने अथवा शीलसौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, सुरापान यांपासून परावृत्त होणे."

8). "औदार्यरूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजुषपणापासून मुक्त करून औदार्याने आणि मुक्तहस्ताने दान करण्यात आनंद मानावयास शिकणे, लोकांनी त्यांच्यासमोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे, अशी योग्यता त्याच्या अंगी आली पाहिजे."

9) "प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय? तुला माहित आहे की ज्या गृहस्थाचे मन हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते तो मनुष्य दुष्कृत्ये करतो. जे कर्तव्य केले पाहिजे त्याजकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो."

10) "हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान, धांदल आणि शंकेखोरपणा हे मनाचे कलंक आहेत. जो गृहस्थ ह्या मानसिक कलंकापासून मुक्त होतो त्याला थोर आणि भरपूर प्रज्ञा लाभते. दोषरहित अशा प्रज्ञेने त्याची दृष्टी स्वच्छ होते. तो पूर्ण ज्ञानी होतो."

11) "अशा रीतीने सन्मार्गाने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरावर, निढळाच्या घामावर संपत्ती कमावणे, ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे. असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी, आनंदी करतो आणि सदैव सुखसमाधान भोगतो. त्याप्रमाणेच आपले आईबाप, पत्नी, मुलेबाळे, सेवक, कामकरी, मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो."

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म