1. धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी धम्माने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग चार- धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत
Section IV
Dhamma to be Saddhamma must Pull Down all Social Barriers
*************************
1. धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी धम्माने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत
Dhamma to be Saddhamma must Break Down Barriers Between Man and Man
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग चार- धम्माला सद्धम्मरूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत
Section IV
Dhamma to be Saddhamma must Pull Down all Social Barriers
*************************
1. धम्माला सद्धम्मरुप प्राप्त होण्यासाठी धम्माने माणसामाणसांत भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत
Dhamma to be Saddhamma must Break Down Barriers Between Man and Man
*************************
1) आदर्श समाज कोणता? ब्राम्हणांच्या मते वेदामध्ये ध्येयरूप समाजाची व्याख्या आहे, आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे, वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे.
2) वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्ण्य.
3) वेदानुसार अशा समाजाने तीन अटी पाळल्या पाहिजेत.
4) पहिली अट म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात चार वर्ण असले पाहिजेत.
5) या वर्गांचे परस्परसंबंध क्रमिक विषमतेच्या तत्त्वावर आधारलेले असले पाहिजेत. म्हणजेच हे सर्व समान असता कामा नयेत. तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यावर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत:
6) ब्राम्हण हे सर्वांच्या वर. क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वर. वैश्य क्षत्रियांच्या खाली, परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली.
7) चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राम्हणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा, शूद्रांचा व्यवसाय वरील तीनही उच्च वर्णांची सेवा.
8) कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही.
9) ह्या आदर्श समाजाच्या सिद्धान्ताचा आग्रह धरून ब्राम्हणांनी तो लोकांना शिकवला.
10) या सिद्धान्ताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून ती ब्राम्हणी धर्माचा शास्त्रसम्मत सिद्धान्त आहे.
11) भगवान बुद्धांचा ह्या सिद्धान्ताला आमूलाग्र विरोध होता.
12) बुद्ध जातिसंस्थेचा सर्वश्रेष्ठ विरोधक असून, समतेचा सर्वांत पहिला आणि अत्यंत खंबीर असा समर्थक होता.
13) जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही, की ज्याचे त्यांनी खंडन केले नाही.
14) या मुद्यावर भगवान बुद्धांना ब्राम्हणांनी पुष्कळच आव्हान दिले. परंतु बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे निरुत्तर केले.
15) अश्वलायन सूक्तांत एक कथा आली आहे. एकदा ब्राम्हणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धाकडे जाऊन, त्याच्या जात आणि विषमता या मतांविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले.
16) अश्वलायन भगवान बुद्धांकडे गेला आणि त्याने ब्राम्हणाचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा पक्ष मांडला.
17) तो म्हणाला, "हे गौतमा, ब्राम्हण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कृष्ण वर्णातील आहेत. पावित्र्य हे केवळ ब्राम्हणांत वसत असते. अब्राम्हणांत ते वसत नाही. केवळ ब्राम्हणच ब्रम्ह्याचे औरसपुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मास आले. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा, तुझे काय म्हणणे आहे?"
18) भगवान बुद्धांच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच गेला.
19) भगवान बुद्ध म्हणाले, "अश्वलायना, ब्राम्हणांच्या स्त्रिया ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळंत होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असूनसुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊनसुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राम्हण खरे मानतात का?"
20) अश्वलायन निरुत्तर झाला.
21) भगवान बुद्धांनी अश्वलायनाला पुढे दुसरा प्रश्न विचारला.
22) "अश्वलायना, समज, एखाद्या क्षत्रियाने ब्राम्हण स्त्रीशी संग केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी जन्माला येईल की, मनुष्य प्राणी?"
23) अश्वलायनाने काहीच उत्तर दिले नाही.
24) "नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राम्हणाच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यांपासून दूर असलेली प्रेमभावना उत्पन्न होईल की इतर वर्णियांच्याही ह्रदयांत ती उत्पन्न होईल?"
25) अश्वलायन म्हणाला, "चारही वर्णांच्या अंतःकरणात प्रेमभावना उत्पन्न होऊ शकतात."
26) भगवान बुद्धांनी विचारले, "अश्वलायना, योन आणि कंबोज आणि त्यांच्या सन्निध असलेल्या देशांत, स्वामी आणि दास हे दोनच वर्ण आहेत आणि तेथे स्वामीचा दास आणि दासाचा स्वामी असे स्थित्यंतर होऊ शकते, हे तू ऐकले आहेस काय?"
27) अश्वलायनाने उत्तर दिले, "होय, मी ऐकले आहे."
28) "तुमचे चातुर्वर्ण्य ही आदर्श समाजरचना असेल, तर ती सर्व देशांत का आढळत नाही?"
29) या कोणत्याही मुद्दयावर अश्वलायनाला जाती आणि विषमता यांविषयीच्या आपल्या सिद्धान्ताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने भगवान बुद्धांचे अनुयायित्व पत्करले.
30) वसिष्ठ नावाच्या एका ब्राम्हणाने बुद्धधर्म स्वीकारलेला होता. ब्राम्हण त्याच्या या धर्मान्तराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत.
31) एके दिवशी तो भगवान बुद्धांकडे गेला आणि ब्राम्हण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धांकडे कथन केले.
32) वसिष्ठ म्हणाला, "भगवान, ब्राम्हण म्हणतात की, ब्राम्हण हाच समाजातील सर्वात उच्च थरांतील असून इतर सर्व वर्ण नीच थरांतील आहेत. ब्राम्हण फक्त शुक्लवर्ण आहेत. इतरांचे वर्ण कृष्ण आहेत. फक्त ब्राम्हण हे शुद्ध वंशातील आहेत. अब्राम्हण शुद्ध वंशातील नाहीत. फक्त ब्राम्हणच ब्रम्ह्याचे खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र आहेत."
33) "आणि (ते मला म्हणतात:) तू तर आपल्या अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंडया भिक्खूंच्या, त्या असंस्कृत श्रीमंतांच्या, त्या कृष्णवर्णाच्या, ब्रम्ह्याच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस, हे चांगले नाही. हे काही उचित नव्हे. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच, शिरमुंडया, कृष्णवर्णीय, गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकांत सामील झाला आहेस!"
34) "भगवान, या शब्दांनी ते ब्राम्हण मला दोष देतात; शेलक्या, बेछूट शिव्या मला घालतात."
35) यावर बुद्ध म्हणाले, "वसिष्ठा, खरोखर ब्राम्हण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेले दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राम्हणीही गर्भार राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकांचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राम्हण मात्र आपण ब्रम्ह्याच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले, त्याचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणवून घेतात. यामुळे ते ब्रम्ह्याची नालस्ती मात्र करतात."
36) एकदा येसुकारी हा ब्राम्हण भगवान बुद्धांजवळ तीन प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला.
37) त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे, कर्माची शाश्वत विभागणी. ह्या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, "मी तुम्हाला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राम्हण म्हणतात, ते सर्वांहून श्रेष्ठ असल्यामुळे, ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत."
38) "हे तथागता, सेवा ही चार वर्णांत विभागली आहे. ब्राम्हणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शुद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार?"
39) भगवान बुद्धांनी त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले, "ब्राम्हणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे का?"
40) "माझ्यासंबंधी विचारशील तर मी सेवा (service) करायची किंवा न करावयाची यांपैकी कशाचाच आग्रह धरत नाही. सेवेचा परिणाम आपणाला वाईट बनविण्यात होत असेल आणि चांगले बनविण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी."
41) "क्षत्रियाचे, ब्राम्हणाचे, वैश्याचे अथवा शूद्राचे वर्तन या मार्गदर्शक तत्त्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो, ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योगे ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढीच सेवा तिने केली पाहिजे."
42) येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला, "माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्याचा वंश आणि कूळ यावरून कां ठरवू नये?"
43) या प्रश्नाला भगवान बुद्धांनी उत्तर दिले, "वंशपरंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो लाकडाचा अग्नी आहे की, ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की, शेणीचा अग्नी आहे हे ठरविले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धान्त हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो."
44) "कुळावरुन माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप, स्वभाव व संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की, थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी कधी खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्वेषी, अथवा चुकीची मते असलेला आढळेल. म्हणून मी म्हणतो की, जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणांपासून अलिप्त असलेलाही आढळेल. म्हणून मी म्हणतो की, कुळामुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही."
45) येसुकारीने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा.
46) येसुकारी तथागतांना म्हणाला, "ब्राम्हण उपजीविकेच्या साधनांचे चार प्रकार मानतात. दानापासून ब्राम्हणाची उपजीविका, क्षत्रियाची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्याची, आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याने शूद्राची. जर या चारांपैकी कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतामाचे मत काय आहे?"
47) "ब्राम्हणांचे हे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय?" बुद्धांनी विचारले.
48) येसुकारीने उत्तर दिले, "नाही."
49) वसिष्ठाला भगवान बुद्धाने सांगितले, *"उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्वाचे आहे."*
("What is important is high ideals and not noble birth.")
50) "जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभावच नकोत. सर्व सारखेच आहेत." असा तथागतांचा उपदेश होता.
51) "जसे दुसरे तसाच मी. जसे आम्ही तसेच दुसरे!" हा भगवान बुद्धांचा उपदेश होता.
Comments
Post a Comment