2. ज्ञानप्राप्ती
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
*********************
भाग चवथा- ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी
Enlightenment and the Vision of a New Way
Enlightenment and the Vision of a New Way
*********************
2. ज्ञानप्राप्ती
Enlightenment
**************************









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. नव्या धम्माचा शोध
*********************
Enlightenment
**************************
1) चिंतन व ध्यान -काळात उपजीविका करण्यासाठी चाळीस दिवस पुरेल इतके अन्न सिद्धार्थ गौतमाने गोळा केले होते.
2) मनाची चलबिचल करणारे दुष्ट विचार मनातून पार काढून टाकल्यानंतर गौतमाने अन्न सेवन केले व तो ताजातवाना झाला. आणि त्याच्या अंगी शक्ती आली. अशाप्रकारे ज्ञान प्राप्ती करुन घेण्याच्या उद्देशाने त्याने चिंतनाची (meditation) पुन्हा तयारी केली.
3) ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी गौतमांना चार आठवडे ध्यानमग्न राहावे लागले. चार पायऱ्यांनी त्यांनी संपूर्ण ज्ञान प्राप्ती करुन घेतली.
4) पहिल्या पायरीच्या वेळी त्यांनी "तर्कशक्ती आणि अन्वेषण" (reason and investigation) यांचा उपयोग केला. त्यांच्या एकांतवासामुळे पहिली पायरी गाठण्यास मदत झाली.
5) दुसऱ्या पायरीच्या वेळी त्यांनी त्यात "एकाग्रतेची" भर टाकली. (concentration)
6) तिसऱ्या पायरीच्या वेळी त्यांनी "मनाचा समतोलपणा व सावधानता" यांचे सहाय्य घेतले. (equanimity and mindfulness)
7) चवथ्या व शेवटच्या पायरीच्या वेळी त्यांनी मनाच्या समतोलपणात "शुद्धता" आणि सावधानतेत "समतोल" अशी भर टाकली.
8 ) अशा प्रकारे एकाग्र, पवित्र, निष्कलंक, निर्दोष, नम्र, चतुर, खंबीर आणि वासनाविरहित अशा मनाने आपला उद्देश न विसरता गौतमाने, ज्या समस्येने त्याला सतावून सोडले होते तिचे उत्तर शोधून काढण्याच्या प्रयत्नावर आपले सर्व लक्ष केंद्रित केले.
9) चौथ्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी त्यांचा मार्ग प्रकाशित झाला. त्यांना स्पष्टपणे दिसून आले की, जगात दोन समस्या आहेत. जगामध्ये दुःख आहे ही पहिली समस्या आहे. आणि हे दुःख कसे नाहिसे करावे व मानवजातीला कसे सुखी करावे ही दुसरी समस्या.
10) याप्रमाणे शेवटी चार आठवडे चिंतन व ध्यान केल्यानंतर अंधःकार नाहीसा होऊन प्रकाशाचा उदय झाला. अज्ञान नष्ट होऊन ज्ञान उदयास आले. त्यांना एक नवा मार्ग दिसला.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
३. नव्या धम्माचा शोध
*********************
Comments
Post a Comment