2. सदाचरणाची आवश्यकता
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
III (तीन)- बुद्धांची सदाचरणावरील प्रवचने
SECTION THREE-- Sermons on Righteousness
*************************
2. सदाचरणाची आवश्यकता
Need for Righteousness
***********************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग चवथा- तथागतांची प्रवचने
Part IV- Buddhas Sermons
*************************
III (तीन)- बुद्धांची सदाचरणावरील प्रवचने
SECTION THREE-- Sermons on Righteousness
*************************
2. सदाचरणाची आवश्यकता
Need for Righteousness
***********************
1) एकदा तथागतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला.
2) "गृहस्थहो, दुष्ट आणि अनीतीमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात:"
3) "दुष्ट आणि अनीतीमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते."
4) "नंतर त्यांची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात."
5) "ज्या लोकांच्या समाजात तो जातो. मग ते क्षत्रिय असो, ब्राम्हण असो, गृहस्थ असो अथवा श्रमण असोत; त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय."
6) "त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्यांचे मरण ओढवते, हा त्याचा चौथा तोटा होय."
7) "दुष्ट आणि अनीतिमान माणसांची, हे गृहस्थहो, अशा प्रकारची हानी होते."
8) "याच्या उलट जी माणसे सज्जन, शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा."
9) "सज्जन, शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्यलाभ होतो."
10) "त्याची सतकीर्ती जगभर पसरते. त्यांना सर्वत्र मान मिळतो."
11) "तो क्षत्रियांच्या, ब्राम्हणांच्या, गृहपतींच्या आथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निःसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो."
12) "त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरतेसमयी तो शांत चित्ताने देहत्याग करतो."
13) "मूर्ख मनुष्याला, तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात."
14) "जो कुणी निरुपद्रवी, निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती, आप्तेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते."
2) "गृहस्थहो, दुष्ट आणि अनीतीमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात:"
3) "दुष्ट आणि अनीतीमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते."
4) "नंतर त्यांची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात."
5) "ज्या लोकांच्या समाजात तो जातो. मग ते क्षत्रिय असो, ब्राम्हण असो, गृहस्थ असो अथवा श्रमण असोत; त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो. तो निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय."
6) "त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्यांचे मरण ओढवते, हा त्याचा चौथा तोटा होय."
7) "दुष्ट आणि अनीतिमान माणसांची, हे गृहस्थहो, अशा प्रकारची हानी होते."
8) "याच्या उलट जी माणसे सज्जन, शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा."
9) "सज्जन, शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्यलाभ होतो."
10) "त्याची सतकीर्ती जगभर पसरते. त्यांना सर्वत्र मान मिळतो."
11) "तो क्षत्रियांच्या, ब्राम्हणांच्या, गृहपतींच्या आथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तेथे निःसंकोच आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो."
12) "त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरतेसमयी तो शांत चित्ताने देहत्याग करतो."
13) "मूर्ख मनुष्याला, तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात."
14) "जो कुणी निरुपद्रवी, निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती, आप्तेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते."
Comments
Post a Comment