2. धम्म जेव्हा केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते, असे शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग दोन- धम्म हा सद्धम्म होण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे
Section II
Dhamma to be Saddhamma must promote Pradnya
*************************
2. धम्म जेव्हा 'केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते,' असे शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते
Dhamma is Saddhamma when it Teaches that Mere Learning is Not Enough: it may Lead to Pedantry
************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
तिसरा खंड- भगवान बुद्धांनी काय शिकविले
Book III- What the Buddha Taught
*************************
भाग पाचवा- सद्धम्म म्हणजे काय?
Part V- What is Saddhamma?
*************************
विभाग दोन- धम्म हा सद्धम्म होण्यासाठी त्याने प्रज्ञेला उत्तेजन दिले पाहिजे
Section II
Dhamma to be Saddhamma must promote Pradnya
*************************
2. धम्म जेव्हा 'केवळ विद्या पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते,' असे शिकवितो तेव्हा त्याला सद्धम्मरूप प्राप्त होते
Dhamma is Saddhamma when it Teaches that Mere Learning is Not Enough: it may Lead to Pedantry
************************
1) एकदा भगवान बुद्ध *कोसांबीच्या' सुस्वर 'विहारात* राहात होते. तेथे जमलेल्या ज्या लोकांना ते उपदेश करीत होते, त्यांच्यामध्ये एक ब्रम्हचारी होता.
2) त्या ब्रह्मचाऱ्याला अभिमान वाटत असे की, वेदज्ञानात आपण अद्वितीय आहोत. वादविवादात हरविणारा कोणी न आढळल्यामुळे, तो ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी हातात एक मशाल घेऊन मिरवीत असे.
3) एके दिवशी एका शहराच्या चौरस्त्यावर त्याला एक मनुष्य भेटला. त्याने त्या ब्रह्मचाऱ्याला त्याच्या त्या विक्षिप्त वर्तनाचे कारण विचारले. त्यावर तो ब्रम्हचारी म्हणाला,
4) "जग अंधःकारमय आहे व लोक भ्रांत आहेत. त्यामुळे जितका प्रकाश करता येईल तितका करण्यासाठी मी ही मशाल बरोबर घेत असतो."
5) त्याला (जमलेल्या लोकांत) पाहिल्यावर भगवान बुद्धांनी हाक मारून विचारले, "या मशालीने तू काय करीत आहेस?"
6) त्या ब्रह्मचाऱ्याने उत्तर दिले, "लोक (सर्व) अज्ञानाच्या अंधःकारात चाचपडत असल्यामुळे, त्यांना मार्ग दाखविण्यासाठी मी ही मशाल धारण करून असतो."
7) नंतर तथागताने त्याला परत विचारले, "खरोखर तू इतका विद्धान आहेस? धर्मग्रंथांतील चार विद्या, म्हणजे शब्दविद्या, ज्योतिर्विद्या, राजविद्या आणि युद्धविद्या तू जाणतोस काय?"
8). या विद्यांशी आपण अपरिचित असल्याचे त्या ब्रह्मचाऱ्याला कबूल करावे लागले. त्याने ती मशाल फेकून दिली. भगवान बुद्धांनी त्याला उद्देशून म्हटले,
9) "मनुष्य कितीही विद्वान असला तरी, तो जर इतरांचा तिरस्कार करण्याइतका स्वतःला मोठा मानू लागला, तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या माणसासारखा आहे. स्वतः आंधळा आणि इतरांना तो काय प्रकाश दाखविणार?"
Comments
Post a Comment