2. समकालीनांविषयी बुद्धांचा दृष्टिकोन

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
भाग सहावा- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
The Buddha and His Contemporaries
*********************
2. समकालीनांविषयी बुद्धांचा दृष्टिकोन
His attitude to His Contemporaries
*************************

1) नव्या तत्त्ववेत्त्यांची शिकवण बुद्धांनी स्वीकारली नाही.

2) त्यांच्या शिकवणुकीला त्यांनी दिलेला नकार अकारण नव्हता. ते म्हणाले:

3) 'पूर्ण काश्यप' किंवा 'पकुध कच्चायन' यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करु शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य तर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्विकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतकीही मजल मारु शकेल.

4) जर 'मक्खली घोसाला' चे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल. तो स्वतःला मुक्त करु शकणार नाही.

5) 'अजित केशकंबला' चे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे, पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करु शकेेल.

6) 'संजय बेलपुत्ता' चे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित असे सकारात्मक तत्त्वज्ञानच असणार नाही.

7) 'निगंठ नाथपुत्ता' चे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच वाहावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहजप्रवृत्ती व कामना यांचा बीमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल.

8 ) याप्रमाणे तत्त्वज्ञान्यांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धांना पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्यांना वाटले. म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले.
 

*************************
(प्रथम खंड, भाग सहावा समाप्त)

*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग सातवा- साम्य आणि भेद
१. बुद्धांनी काय नाकारले (त्याज्य ठरविले)
*********************

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म