2. अंतिम धर्म-दीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
2. अंतिम धर्म-दीक्षा
The Last Convert
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
2. अंतिम धर्म-दीक्षा
The Last Convert
*************************
1) सुभद्र नावाचा परिव्राजक कुशिनारा येथे राहत होता. सुभद्र परिव्राजकाच्या कानावर लोकवार्ता पडली. "असे म्हणतात की, आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी गौतम बुद्धांचे परिनिर्वाण होणार आहे." तेव्हा सुभद्र परिव्राजकाच्या मनात आले:
2) "काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्राजकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की, ह्या जगात अर्हत, सम्यक, संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत. आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह निर्माण झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की, ते मला असा उपदेश देतील की, जेणेकरुन माझ्या संदेहाचे निराकरण होईल."
3) सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला "स्थविर आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय?"
4) त्याचे शब्द ऐकून स्थविर आनंद त्याला म्हणाला, "पुरे, पुरे सुभद्र! तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते पार थकून गेले आहेत."
5) सुभद्र परिव्राजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा विनंती केली. स्थविर आनंदाने त्याला तीनही वेळा तेच उत्तर दिले.
6) सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारुन म्हटले, "आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागावयाचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल. मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि जे उत्तरादाखल मी सांगेन ते तत्काळ त्याला समजेल."
7) तेव्हा स्थविर आनंद परिव्राजकाला म्हणाला, "सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांची तुला परवानगी आहे."
8). तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करुन कुशल-वर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूला जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला,
9) "श्रमण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पंथसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानीत आली आहे, असे श्रमण आणि ब्राम्हण - पूर्णकाश्यप, मख्खली गोशाल, अजित केशकंम्बल, पकुध कच्चायन, वेलट्टीपुत्र संजय तसेच नाथपुत्र निगण्ठ ह्या सर्वांना ते म्हणतात तसे आपल्या आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही? की काहींना झाले आणि काहींना झाले नाही?"
10) "सुभद्र! काहींना ज्ञान प्राप्त झाले की, काहींना प्राप्त झाले नाही या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. मी तुला धम्मोपदेश करतो तो नीट ध्यान देऊन श्रवण कर. लक्ष दे. मी सांगतो."
11) "तथागत! फार चांगले." असे बोलून सुभद्र परिव्राजकाने तथागत बुद्धांकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर तथागत बोलले;
12) "सुभद्र! ज्या धम्ममतामध्ये अरिय- अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्मात अरिय अष्टांगिक मार्ग आहे, त्यात श्रमणही असतो."
13) "सुभद्र! माझ्या धम्मात अरिय अष्टांगिक मार्ग आहे. म्हणून या धम्मात चार प्रकारचे (चार स्तरांवरील) श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे; पण सुभद्र जर ह्या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर ह्या जगतात अर्हतांचा अभाव कधीच आढळणार नाही."
14) "मी एकोणतीस वर्षांचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो."
15) "सुभद्र! सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्याला आता पन्नासहून अधिक वर्षे होऊन गेली असतील."
16) तथागतांनी वरीलप्रमाणे सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक बोलला, "आपल्या मुखीचे हे शब्द अत्युत्कृष्ट आहेत. खरोखरच अत्युत्कृष्ट!"
17) "जसे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की, जेणेकरुन नेत्र असलेल्यांना दिसावे;"
18) "तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करुन दिले. म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो."
19) "सुभद्र! ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली त्याला जर संघात प्रवेश करावयाची इच्छा असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा करणे क्रमप्राप्त आहे."
20) "जर असा दंडक असेल तर मीही चार महिने प्रतिक्षा करीन." (सुभद्र म्हणाला)
21) पण तथागत म्हणाले, "माणसामाणसात फरक असतो हे मी मान्य करतो." असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले, "आनंद! सुभद्राला आताच संघात दाखल करुन घे."
22) "बरे, जशी आपली आज्ञा." असे बोलून आनंदाने संमती दर्शवली.
23) सुभद्र परिव्राजक मग आनंदाला म्हणाला, "तुम्ही भाग्यवान आहात आनंद! महाभाग्यवान! तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खूसंघात शिष्यत्व प्रदान केले."
24) "सुभद्र! तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे," स्थविर आनंद म्हणाला.
24) अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिव्राजकाला भिक्खूसंघात स्वीकृत करण्यात आले. ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक.
2) "काही वयोवृद्ध गुरु आणि शिष्य परिव्राजकांना असे म्हणताना मी ऐकले आहे की, ह्या जगात अर्हत, सम्यक, संबुद्ध असे तथागत वारंवार निर्माण होत नाहीत. आणि आज रात्रीच्या अखेरच्या प्रहरी श्रमण गौतमाचे परिनिर्वाण होणार आहे. माझ्या मनात एक संदेह निर्माण झाला आहे आणि श्रमण गौतमाबद्दल मला खात्री वाटते की, ते मला असा उपदेश देतील की, जेणेकरुन माझ्या संदेहाचे निराकरण होईल."
3) सुभद्र परिव्राजक उपमार्गाने मल्लांच्या शालवनात गेला. तिथे स्थविर आनंद होता. सुभद्र त्याला म्हणाला "स्थविर आनंद, मला श्रमण गौतमाचे दर्शन होईल काय?"
4) त्याचे शब्द ऐकून स्थविर आनंद त्याला म्हणाला, "पुरे, पुरे सुभद्र! तथागतांना आता मुळीच त्रास देता कामा नये. ते पार थकून गेले आहेत."
5) सुभद्र परिव्राजकाने दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा पुन्हा विनंती केली. स्थविर आनंदाने त्याला तीनही वेळा तेच उत्तर दिले.
6) सुभद्र परिव्राजक आणि स्थविर आनंदाचा चाललेला हा संवाद तथागतांनी ऐकला. त्यांनी आनंदाला हाक मारुन म्हटले, "आनंदा, सुभद्राला अडवू नकोस. सुभद्राला तथागताचे दर्शन घेण्याची अनुमती असावी. सुभद्राला जे काही माझ्यापाशी मागावयाचे असेल ते त्याला ज्ञानासाठी हवे असेल. मला त्रास देण्याच्या इच्छेने नव्हे. आणि जे उत्तरादाखल मी सांगेन ते तत्काळ त्याला समजेल."
7) तेव्हा स्थविर आनंद परिव्राजकाला म्हणाला, "सुभद्रा, आत प्रवेश कर. तथागतांची तुला परवानगी आहे."
8). तेव्हा सुभद्र परिव्राजक तथागतांच्या समीप गेला आणि त्यांना अभिवादन करुन कुशल-वर्तमानाचे बोलणे झाल्यावर तो एका बाजूला जाऊन बसला. बसल्यावर तथागतांना उद्देशून तो बोलला,
9) "श्रमण गौतम, ज्यांना अनुयायी आहेत आणि श्रोते आहेत, जे प्रसिद्ध आहेत, जे गणाचार्य आहेत, जे पंथसंस्थापक आहेत, ज्यांना जनता धर्मात्मा मानीत आली आहे, असे श्रमण आणि ब्राम्हण - पूर्णकाश्यप, मख्खली गोशाल, अजित केशकंम्बल, पकुध कच्चायन, वेलट्टीपुत्र संजय तसेच नाथपुत्र निगण्ठ ह्या सर्वांना ते म्हणतात तसे आपल्या आपणच सत्यज्ञान प्राप्त झाले आहे की नाही? की काहींना झाले आणि काहींना झाले नाही?"
10) "सुभद्र! काहींना ज्ञान प्राप्त झाले की, काहींना प्राप्त झाले नाही या असल्या गोष्टीत तू पडू नकोस. मी तुला धम्मोपदेश करतो तो नीट ध्यान देऊन श्रवण कर. लक्ष दे. मी सांगतो."
11) "तथागत! फार चांगले." असे बोलून सुभद्र परिव्राजकाने तथागत बुद्धांकडे एकाग्रतेने ध्यान दिले. त्यावर तथागत बोलले;
12) "सुभद्र! ज्या धम्ममतामध्ये अरिय- अष्टांगिक मार्ग नाही त्यात श्रमण असू शकत नाही. ज्या धम्मात अरिय अष्टांगिक मार्ग आहे, त्यात श्रमणही असतो."
13) "सुभद्र! माझ्या धम्मात अरिय अष्टांगिक मार्ग आहे. म्हणून या धम्मात चार प्रकारचे (चार स्तरांवरील) श्रमण आहेत. दुसऱ्या धम्ममतात श्रमणाचा अभाव आहे; पण सुभद्र जर ह्या धम्ममताच्या अनुयायांनी सम्यक जीवन व्यतीत केले तर ह्या जगतात अर्हतांचा अभाव कधीच आढळणार नाही."
14) "मी एकोणतीस वर्षांचा असताना सत्याच्या शोधासाठी बाहेर पडलो."
15) "सुभद्र! सद्धम्माचा पक्ष स्वीकारल्याला आता पन्नासहून अधिक वर्षे होऊन गेली असतील."
16) तथागतांनी वरीलप्रमाणे सांगितल्यावर सुभद्र परिव्राजक बोलला, "आपल्या मुखीचे हे शब्द अत्युत्कृष्ट आहेत. खरोखरच अत्युत्कृष्ट!"
17) "जसे कोणी फेकून दिलेल्याची प्रतिष्ठापना करावी किंवा झाकलेले खुले करावे किंवा मार्गभ्रष्टाला सन्मार्ग दाखवावा किंवा अंधारात दीप प्रज्वलित करावा की, जेणेकरुन नेत्र असलेल्यांना दिसावे;"
18) "तसे मला तथागतांनी सत्याचे ज्ञान करुन दिले. म्हणून मी बुद्ध, धम्म आणि संघाचा आश्रय स्वीकारतो."
19) "सुभद्र! ज्याने पूर्वी दुसऱ्या धम्माची दीक्षा घेतली त्याला जर संघात प्रवेश करावयाची इच्छा असेल तर त्याला चार महिने प्रतीक्षा करणे क्रमप्राप्त आहे."
20) "जर असा दंडक असेल तर मीही चार महिने प्रतिक्षा करीन." (सुभद्र म्हणाला)
21) पण तथागत म्हणाले, "माणसामाणसात फरक असतो हे मी मान्य करतो." असे म्हणून त्यांनी आनंदाला हाक मारली व ते बोलले, "आनंद! सुभद्राला आताच संघात दाखल करुन घे."
22) "बरे, जशी आपली आज्ञा." असे बोलून आनंदाने संमती दर्शवली.
23) सुभद्र परिव्राजक मग आनंदाला म्हणाला, "तुम्ही भाग्यवान आहात आनंद! महाभाग्यवान! तुम्हाला स्वतः तथागतांनी धर्मजलाचे सिंचन करून दीक्षा दिली व भिक्खूसंघात शिष्यत्व प्रदान केले."
24) "सुभद्र! तुझ्या बाबतीतही तसेच झाले आहे," स्थविर आनंद म्हणाला.
24) अशा रीतीने तथागतांच्या अनुज्ञेने सुभद्र परिव्राजकाला भिक्खूसंघात स्वीकृत करण्यात आले. ज्याला स्वतः तथागतांनी दीक्षा दिली असा तोच अखेरचा श्रावक.
Comments
Post a Comment