2. चंडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग सातवा- स्रियांची धम्मदीक्षा
Conversion of Women
*************************
2. चंडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा
Conversion of Prakrati, a Chandalika
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग सातवा- स्रियांची धम्मदीक्षा
Conversion of Women
*************************
2. चंडालिका प्रकृतीची धम्मदीक्षा
Conversion of Prakrati, a Chandalika
*************************
1) एकदा श्रावस्ती येथे अनाथपिंडकाच्या 'जेतवन आराम' येथे भगवान बुद्ध राहात होते.
2) भगवंतांचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता.
3) त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले.
4) प्रकृती नावाच्या त्या मुलीने "मी चांडालिका आहे " असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले.
5) आनंद म्हणाला, "मला पाणी हवे आहे. मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही." मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले.
6) नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धांचा शिष्य आहे.
7) घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली.
8) आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, "जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन; मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही."
9) आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की, "हे लग्न अशक्य आहे; कारण आनंदाने ब्रम्हचर्याचे व्रत धारण केले आहे."
10) हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, "आई! तुला चेटुकाची कला (art of sorcery) अवगत आहे ना? मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस?" आई म्हणाली, "काय करता येईल ते मी पाहते."
11) मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्या वेळी मातंगी आनंदाला म्हणाली, "माझी मुलगी आपल्याशी लग्न करण्यास फार उत्सुक आहे." आनंदाने उत्तर दिले, "मी ब्रम्हचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही."
12) "जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील; इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे." मातंगीने आनंदाला सांगितले.
"पण माझा नाइलाज आहे." आनंदाने उत्तर दिले.
13) मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले.
14) मुलीने ओरडून विचारले, "आई, तुझी ती चेटुक-विद्या गेली कुठे?" आई म्हणाली, "माझे चेटुक तथागतांच्या विरुध्द चालू शकत नाही."
15) मुलगी ओरडून म्हणाली, "दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस. म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते."
16) आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोषाख करून मुलीने आत पाऊल टाकले. परंतु आनंद अचल राहिला.
17) आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला. त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, "जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल, तर तुम्हांला मी या आगीत फेकून देईन." तथापि आनंद शरण गेला नाही. आईने व मुलीने असहाय होऊन त्याला सोडून दिले.
18) आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली.
19) दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला. परंतु तो जिथे गेला तिथे तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली.
2) भगवंतांचा शिष्य आनंद एकदा नगरात भिक्षा मागण्यासाठी गेला होता. भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता.
3) त्याने तेथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली. आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले.
4) प्रकृती नावाच्या त्या मुलीने "मी चांडालिका आहे " असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले.
5) आनंद म्हणाला, "मला पाणी हवे आहे. मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही." मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले.
6) नंतर आनंद जेतवनाकडे जाण्यासाठी निघाला. ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली. तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धांचा शिष्य आहे.
7) घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी हिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली.
8) आईने तिला रडण्याचे कारण विचारले. सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली, "जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करीन; मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही."
9) आईने चौकशीला सुरुवात केली. परत आल्यावर तिने सांगितले की, "हे लग्न अशक्य आहे; कारण आनंदाने ब्रम्हचर्याचे व्रत धारण केले आहे."
10) हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला. ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती. म्हणून ती म्हणाली, "आई! तुला चेटुकाची कला (art of sorcery) अवगत आहे ना? मग आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस?" आई म्हणाली, "काय करता येईल ते मी पाहते."
11) मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले. मुलीला फारच आनंद झाला. त्या वेळी मातंगी आनंदाला म्हणाली, "माझी मुलगी आपल्याशी लग्न करण्यास फार उत्सुक आहे." आनंदाने उत्तर दिले, "मी ब्रम्हचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही."
12) "जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील; इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे." मातंगीने आनंदाला सांगितले.
"पण माझा नाइलाज आहे." आनंदाने उत्तर दिले.
13) मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले.
14) मुलीने ओरडून विचारले, "आई, तुझी ती चेटुक-विद्या गेली कुठे?" आई म्हणाली, "माझे चेटुक तथागतांच्या विरुध्द चालू शकत नाही."
15) मुलगी ओरडून म्हणाली, "दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस. म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते."
16) आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले. रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला. उत्कृष्ट पोषाख करून मुलीने आत पाऊल टाकले. परंतु आनंद अचल राहिला.
17) आईने शेवटी चेटुकाचा प्रयोग केला. त्यामुळे खोलीत आग भडकली. आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली, "जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल, तर तुम्हांला मी या आगीत फेकून देईन." तथापि आनंद शरण गेला नाही. आईने व मुलीने असहाय होऊन त्याला सोडून दिले.
18) आनंदाने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली.
19) दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेतवनात आली. आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता. त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला. परंतु तो जिथे गेला तिथे तिथे ती मुलगीही त्याच्या मागोमाग गेली.
20) जेव्हा आनंद जेतवनात परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले.
21) या मुलीने आपला कसा पिच्छा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले. भगवंतांनी तिला बोलाविण्यास सांगितले.
22) मुलगी समोर आल्यावर तथागतांनी तिला प्रश्न केला, "तू आनंदाचा पिच्छा का
पुरवीत आहेस?" मुलगी म्हणाली, "त्यांच्याशी मला लग्न करायचे आहे. ते
अविवाहित असल्याचे मी ऐकले आहे व मीही अविवाहित आहे."
23) भगवंत म्हणाले, "आनंद हा भिक्खू आहे; आणि त्याच्या डोक्यावर केस नाहीत.
जर तूही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहीन."
24) मुलीने उत्तर दिले, "माझी तयारी आहे." भगवंत म्हणाले, "मुंडन करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस."
25) मुलगी आईकडे आली आणि म्हणाली, "आई, तुला जे करता आले नाही ते मी केले
आहे. मी मुंडन केले तर आनंदाशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंतांनी दिले
आहे."
26) आई रागावली आणि म्हणाली, "तू तसे मुळीच करता कामा नये. तू माझी मुलगी
आहेस आणि तू केस राखलेच पाहिजेस. आनंदासारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू
इतकी कां उतावीळ झाली आहेस? त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न
लावून देईन."
27) तिने उत्तर दिले, "मी आनंदाशीच लग्न करीन किंवा प्राण देईन. माझ्यापुढे तिसरा पर्याय नाही."
28) आई म्हणाली, "तू माझा अपमान का करीत आहेस?" मुलगी म्हणाली, "जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करु दे."
29) आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले.
30) नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली, "आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे."
31) तथागतांनी तिला विचारले, "तुला काय पाहिजे आहे? त्याच्या शरीराचा कोणता
भाग तुला आवडतो?" मुलगी म्हणाली, "माझे त्यांच्या नाकावर प्रेम आहे.
त्यांच्या मुखावर प्रेम आहे, त्यांच्या कानावर प्रेम आहे. त्यांच्या
आवाजावर प्रेम आहे, त्यांच्या डोळ्यांवर माझे प्रेम आहे. आणि त्यांच्या
चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे."
32) तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले, "डोळे हे अश्रूंचे घर आहे. नाक हे
घाणीचे घर आहे, तोंड हे थूंकीचे घर आहे, कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे
मलमूत्राचे आगर आहे, हे तुला माहीत आहे काय?"
33) "मुली, आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे, हे मला कळत नाही."
34) मुलगी विचार करु लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह
धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे
सांगितले.
35) भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली, "अज्ञानामुळे मी आनंदाच्या
मागे लागले होते. आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे. माझी स्थिती वादळात
सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यावर सुरक्षित पोचलेल्या नौकेवरील नाविकासारखी
झाली आहे. निराश्रित झालेल्या वृद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे.
आंधळ्याला नवी दृष्टी लाभावी अशी माझी स्थिती झाली आहे. भगवन्तानी आपल्या
सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे."
36) "प्रकृती, तू भाग्यवान आहेस; कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन
स्त्री-पुरुषांपुढील आदर्श आहेस. तू हीन जातीची आहेस पण ब्राम्हणही
तुझ्यापासून धडा घेतील. न्याय आणि सदाचरण यांच्या मार्गावरुन तू ढळू नकोस
म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील."
37) विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिक्खुणींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता.
38) त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती सर्वात खालचा मानला
गेलेल्या समाजातील होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला.
*************************
*
*भाग सातवा समाप्त*
*
*************************
*


*************************
Comments
Post a Comment