3. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग आठवा- पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा
Conversion of the Fallen and the Criminals
*************************
3. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा
Conversion of Other Criminals
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
Campaign of Conversion
*************************
भाग आठवा- पतित व गुन्हेगार यांची धम्मदीक्षा
Conversion of the Fallen and the Criminals
*************************
3. इतर गुन्हेगारांची धम्मदीक्षा
Conversion of Other Criminals
*************************
1) राजगृहाच्या दक्षिणेस सुमारे 200 योजने दूर एक पर्वत होता.
2) या पर्वतावर एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता.
3) पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहात असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाश्यांची लूटमार आणि खून करीत.
4) त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे; परंतु ते नेहमी निसटून जात.
5) जवळच राहात असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकवण्यासाठी या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून तथागतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले.
6) आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेष धारण केला. खडग आणि धनुष्य यांसह, उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्याच्या जीनाला सोन्या-चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जडजवाहीर लावून सजविला.
7) दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला; तो आवाज ऐकल्याबरोबर ते पाचशे दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले; "लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती; चला, जल्दी करून आपण त्याला पकडू या."
8). तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरु लागले. पण त्याला पाहता क्षणीच ते जमिनीवर पडले.
9) ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, "अरे देवा हे काय आहे? अरे देवा हे काय आहे?"
10) त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की, *"ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की, त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात (wounds of unbelief and doubt), त्या, ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहेत. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञाजागृती होते त्यांनीच ह्या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरुन येऊ शकतात. दुसऱ्या कशाने त्या भरु शकत नाहीत."* नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला:
11) "दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रान्त झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते."
12) "आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते."
13) "म्हणून, अश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते."
14) "ज्याने सर्वात उत्तम पुण्य (greatest merit) संपादिले आहे तोच ह्या पदवीला व सन्मानाला पात्र ठरतो (most to be revered)."
15) हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चात्ताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरुन निघाल्या.
16) नंतर ते भगवंतांचे शिष्य झाले. आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला.
2) या पर्वतावर एक घोर आणि निर्जन अशी दरी होती आणि तिच्यातून दक्षिण भारताकडे जाणारा एक रस्ता होता.
3) पाचशे दरोडेखोर या ठिकाणी राहात असत आणि त्या वाटेने जाणाऱ्या प्रवाश्यांची लूटमार आणि खून करीत.
4) त्यांना पकडण्यासाठी राजा आपले सैन्य पाठवित असे; परंतु ते नेहमी निसटून जात.
5) जवळच राहात असलेल्या भगवान बुद्धांनी या लोकांच्या स्थितीचा विचार केला. त्यांना स्वतःच्या वर्तनाचे स्वरूप कळत नव्हते आणि जरी भगवंत त्यांना शिकवण्यासाठी या जगात आले होते तरी ते त्या लोकांच्या दृष्टीस पडले नव्हते किंवा त्यांच्या धम्माची माहितीही त्यांच्या कानावर पडली नव्हती. म्हणून तथागतांनी त्यांच्याकडे जाण्याचे ठरविले.
6) आपल्या निश्चयानुसार त्यांनी श्रीमंत माणसाचा वेष धारण केला. खडग आणि धनुष्य यांसह, उत्तम झूल घातलेल्या उमद्या घोड्यावर ते स्वार झाले. त्याच्या जीनाला सोन्या-चांदीच्या पिशव्या लटकत ठेवल्या होत्या व घोड्याचा लगाम मौल्यवान जडजवाहीर लावून सजविला.
7) दरीत शिरल्याबरोबर त्यांचा घोडा जोराने खिंकाळला; तो आवाज ऐकल्याबरोबर ते पाचशे दरोडेखोर निघाले आणि त्या प्रवाशाला पाहून उद्गारले; "लूट करण्याची अशी संधी आपल्याला कधी मिळाली नव्हती; चला, जल्दी करून आपण त्याला पकडू या."
8). तो प्रवासी निसटून जाऊ नये म्हणून ते त्याला घेरु लागले. पण त्याला पाहता क्षणीच ते जमिनीवर पडले.
9) ते जमिनीवर पडल्यानंतर उद्गारले, "अरे देवा हे काय आहे? अरे देवा हे काय आहे?"
10) त्यावर त्या प्रवाशाने त्या डाकूंना समजावून सांगितले की, *"ह्या सर्व संसाराला घेरून टाकणारे दुःख एवढे प्रचंड आहे की, त्याच्या मानाने ते डाकू दुसऱ्याला जे दुःख देतात किंवा स्वतः सोसतात त्याच्या यातना काहीच नाहीत. अश्रद्धा आणि संदेह यामुळे ज्या जखमा आणि यातना निर्माण होतात (wounds of unbelief and doubt), त्या, ते डाकू दुसऱ्यांना ज्या जखमा आणि यातना करतात किंवा स्वतः सोसतात त्यापेक्षा अधिक आहेत. धर्मोपदेश एकाग्रतेने ऐकण्याने जी प्रज्ञाजागृती होते त्यांनीच ह्या अश्रद्धा व संदेहाच्या जखमा भरुन येऊ शकतात. दुसऱ्या कशाने त्या भरु शकत नाहीत."* नंतर तो प्रवासी पुढे म्हणाला:
11) "दुःखासारखी यातना देणारी जखम दुसरी कोणतीही नाही. दुष्कृत्यासारखा खोलवर रुतणारा दुसरा कोणताही तीक्ष्ण बाण नाही. धार्मिक शिकवणुकीच्या एकनिष्ठ परिपालनाखेरीज यावर दुसरा कोणताही उपाय नाही. या शिकवणुकीमुळे आंधळ्याला दृष्टी मिळते, भ्रान्त झालेल्यांना ज्ञान प्राप्त होते."
12) "आंधळ्यांना दृष्टी मिळावी त्याप्रमाणे या शिकवणुकीमुळे लोकांना या प्रकाशामुळे मार्गदर्शन होते."
13) "म्हणून, अश्रद्धा दूर करण्यास, दुःख नाहीसे करण्यास आणि आनंद मिळवून देण्यास ही धम्माची शिकवण समर्थ आहे. जे ती ऐकतात त्यांनाच ही सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त होते."
14) "ज्याने सर्वात उत्तम पुण्य (greatest merit) संपादिले आहे तोच ह्या पदवीला व सन्मानाला पात्र ठरतो (most to be revered)."
15) हे ऐकल्यावर त्या दरोडेखोरांना आपल्या दुष्ट जीवनाचा पश्चात्ताप झाला. त्यांच्या अंगात रुतलेले बाण गळून पडले आणि त्यांच्या जखमा भरुन निघाल्या.
16) नंतर ते भगवंतांचे शिष्य झाले. आणि त्यांना स्वास्थ्य व शांती यांचा लाभ झाला.
Comments
Post a Comment