3. सुखी कुटुंबे उद्ध्वस्त केल्याचा आरोप
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग दुसरा- बुद्धांचे विरोधक व शत्रू
Part II- His Enemies
*************************
3. सुखी कुटुंबे उद्ध्वस्त केल्याचा आरोप
Charge of Breaking Happy Households
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग दुसरा- बुद्धांचे विरोधक व शत्रू
Part II- His Enemies
*************************
3. सुखी कुटुंबे उद्ध्वस्त केल्याचा आरोप
Charge of Breaking Happy Households
*************************
1) मगध देशातील पुष्कळ थोर तरुण सरदारपुत्र तथागतांचे शिष्य झालेले पाहून लोक रागावले आणि चिडले. ते बोलू लागले, "श्रमण गौतम मातापित्यांना निःसंतान बनवित आहेत. श्रमण गौतम विवाहित स्त्रियांना विधवा बनवीत आहेत. श्रमण गौतम कुटुंबाचा नाश करीत आहेत."
2) "त्यांनी एक सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली. संजयाच्या अडीचशे अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही."
3) आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडत तेव्हा ते त्यांना असे चिडवत असत, "महाश्रमण मगधदेशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार?"
4) भिक्खूंच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी तथागतांना निवेदन दिले.
5) तथागत म्हणाले, "हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त एक सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल."
6) "आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की, जे महावीर आहेत, जे तथागत आहेत ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर विद्धान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे? माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून दीक्षा घ्यावी."
7) भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की, शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहे; कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले.
2) "त्यांनी एक सहस्त्र जटिलांना दीक्षा दिली. संजयाच्या अडीचशे अनुयायांना त्यांनी दीक्षा दिली. मगध देशातील पुष्कळ थोर तरुण कुलवंत श्रमण गौतमाच्या नादी लागून पवित्र जीवन व्यतीत करीत आहेत. आता पुढे काय होईल ते सांगता येणार नाही."
3) आणि जेव्हा त्यांच्या दृष्टीस भिक्खू पडत तेव्हा ते त्यांना असे चिडवत असत, "महाश्रमण मगधदेशी राजगृहात संजयाच्या सर्व अनुयायांसह आले आहेत. आता आणखी कोणाच्या वाटेला ते जाणार?"
4) भिक्खूंच्या कानी हे आरोप पडले आणि त्यांनी तथागतांना निवेदन दिले.
5) तथागत म्हणाले, "हा गदारोळ फार दिवस टिकणार नाही. फक्त एक सप्ताहच तो टिकेल. सप्ताहानंतर सर्व काही शांत होईल."
6) "आणि जर ते तुम्हाला चिडवू लागले तर त्यांना सांगा की, जे महावीर आहेत, जे तथागत आहेत ते सद्धर्माच्या मार्गाने जातात. जर विद्धान पुरुष लोकांना सन्मार्गाने नेऊ लागले तर त्यात तक्रार करण्यासारखे काय आहे? माझ्या धम्मात कसल्याच जबरदस्तीला स्थान नाही. वाटल्यास कुणी गृहत्याग करावा किंवा गृहस्थ राहून दीक्षा घ्यावी."
7) भिक्खूंनी जेव्हा टीकाकारांना तथागतांचे हे शब्द सांगितले तेव्हा त्यांना समजून चुकले की, शाक्यपुत्र श्रमण लोकांना सन्मार्गानेच नेत आहे; कुमार्गाने नव्हे. आणि मग त्यांनी तथागतांना दोष देण्याचे थांबविले.
Comments
Post a Comment