3. सारीपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
*************************
3. सारीपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा
Conversion of Sariputta and Moggalan
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
दुसरा खंड- धम्मदीक्षेची मोहीम
*************************
भाग तिसरा- उच्चकुलीन व पवित्र व्यक्तींची धम्मदीक्षा
Conversion of the High and the Holy
*************************
3. सारीपुत्त आणि मोग्गलान यांची धम्मदीक्षा
Conversion of Sariputta and Moggalan
*************************
1) तथागत राजगृहात राहात असताना संजय नावाचा एक प्रसिद्ध मनुष्य तेथे राहात होता. सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहात होते.
2) त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाने दोन ब्राम्हण तरुण होते.
3) संजयच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते. आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते.
4) एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खू़ंपैकी स्थविर अश्वजित (Assaji) आपले चीवर परिधान करुन आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आले.
5) अश्वजितची धीर-गंभीर चालचलणूक पाहून सारीपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करु लागला, "खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील महान योग्यतेचा भिक्खु आहे. जर मी या भिक्खुकडे गेलो आणि, "मित्रा, तू कुणामुळे है वैराग्य प्राप्त करुन घेतलेस? तुझा गुरु कोण? तू कोणता धम्म मानतोस?" असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे?"
6) परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला, "ह्या भिक्खुला हे विचारण्याची ही योग्य वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर यांच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे?"
7) आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यानंतर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरले. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्याला विनम्र अभिवादन केले आणि अदबीने त्यांच्याशी बोलून तो त्यांच्या जवळ उभा राहिला.
8) अश्वजितच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले, "मित्रा, आपली मुद्रा शांत आहे. आपले रुप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता?"
9) अश्वजित म्हणाला, "मित्रा, शाक्यकुळात जन्मलेले एक महान श्रमण आहेत. त्यांच्याच नावाने मी ही परिव्रज्या धारण केली आहे. तेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे."
10) "वंदनीय महाराज, आपल्या गुरुंचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे?"
11) "मित्रा, मी एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दिक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांंचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही. पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन."
12) परिव्राजक सारीपुत्त स्थविर अश्वजितास म्हणाला, "ठीक आहे. आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा. परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे. शब्दांचे अवडंबर कशाला?"
13) अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले.
14) सारीपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहात असत. त्यांनी एकमेकांना वचन दिले होते. 'ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुस-याला सांगावे' असे त्यांचे परस्परांत ठरले होते.
15) ठरल्याप्रमाणे मोग्गलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोग्गलान म्हणाला, "मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे. तुझे रूप स्वच्छ आणि तेजस्वी आहे; सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय?"
16) "होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे."
"मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले?"
नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला.
17) नंतर मोग्गलान सारीपुत्ताला म्हणाला, "मित्रा, चल, आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरू होतील."
18) सारीपुत्त उत्तरला, "मित्रा, हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहात आहेत, आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू; मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील."
19) नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्या जवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, "मित्रहो, आम्ही तथागत बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत."
20) ते उत्तरले, "महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्हीही तोच मार्ग पत्करू."
21) नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, "मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत."
22) संजय उत्तरला, "छे, छे; मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ."
23) सारीपुत्त आणि मोग्गलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले.
24) नंतर अडीचशे परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोग्गलान भगवान बुद्ध जेथे राहात होते त्या राजगृहातील वेळु-वनात गेले.
25) सारीपुत्त आणि मोग्गलान दुरुनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, "ते पाहा, भिक्खूहो, दोन सोबती येत आहेत." सारीपुत्त आणि मोग्गलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, "हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील."
26) वेळु-वनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग वंदन केले आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणांवर ठेवून ते तथागतांस म्हणाले, "तथागतांनी आम्हाला दीक्षा द्यावी."
27) नंतर, "एहि भिक्खवें" (Ehi Bhikku)
(भिक्खूंनो, या) हे शब्द तथागतांनी उच्चारले आणि सारीपुत्त, मोग्गलान आणि अडीचशे जटील बुद्धांचे शिष्य झाले.
2) त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोग्गलान या नावाने दोन ब्राम्हण तरुण होते.
3) संजयच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोग्गलान यांचे समाधान झाले नव्हते. आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते.
4) एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खू़ंपैकी स्थविर अश्वजित (Assaji) आपले चीवर परिधान करुन आणि भिक्षापात्र व दुसरे चीवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आले.
5) अश्वजितची धीर-गंभीर चालचलणूक पाहून सारीपुत्त चकित झाला. वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करु लागला, "खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील महान योग्यतेचा भिक्खु आहे. जर मी या भिक्खुकडे गेलो आणि, "मित्रा, तू कुणामुळे है वैराग्य प्राप्त करुन घेतलेस? तुझा गुरु कोण? तू कोणता धम्म मानतोस?" असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे?"
6) परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला, "ह्या भिक्खुला हे विचारण्याची ही योग्य वेळ नव्हे. तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे. याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर यांच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे?"
7) आणि राजगृहातील आपली भिक्षायात्रा संपविल्यानंतर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरले. नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारीपुत्त गेला. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्याला विनम्र अभिवादन केले आणि अदबीने त्यांच्याशी बोलून तो त्यांच्या जवळ उभा राहिला.
8) अश्वजितच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारीपुत्ताने त्याला विचारले, "मित्रा, आपली मुद्रा शांत आहे. आपले रुप शुद्ध आणि तेजस्वी आहे. आपण कोणामुळे हे वैराग्य धारण केले आहे? आपला गुरु कोण? आपण कोणता धम्म मानता?"
9) अश्वजित म्हणाला, "मित्रा, शाक्यकुळात जन्मलेले एक महान श्रमण आहेत. त्यांच्याच नावाने मी ही परिव्रज्या धारण केली आहे. तेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे."
10) "वंदनीय महाराज, आपल्या गुरुंचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे?"
11) "मित्रा, मी एक तरुण शिष्य आहे. मी नुकतीच दिक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांंचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे. मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही. पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन."
12) परिव्राजक सारीपुत्त स्थविर अश्वजितास म्हणाला, "ठीक आहे. आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा. परंतु मला त्याचा अर्थ सांगा. मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे. शब्दांचे अवडंबर कशाला?"
13) अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला. त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले.
14) सारीपुत्त आणि मोग्गलान हे जरी सख्खे भाऊ नव्हते तरी ते सख्ख्या भावाप्रमाणे राहात असत. त्यांनी एकमेकांना वचन दिले होते. 'ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुस-याला सांगावे' असे त्यांचे परस्परांत ठरले होते.
15) ठरल्याप्रमाणे मोग्गलान जेथे होता तेथे सारीपुत्त गेला. सारीपुत्ताला पाहून मोग्गलान म्हणाला, "मित्रा, तुझी मुद्रा शांत आहे. तुझे रूप स्वच्छ आणि तेजस्वी आहे; सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय?"
16) "होय मित्रा, मला सत्याचे ज्ञान झाले आहे."
"मित्रा, ते ज्ञान तुला कसे झाले?"
नंतर सारीपुत्ताने त्याला अश्वजिताबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला.
17) नंतर मोग्गलान सारीपुत्ताला म्हणाला, "मित्रा, चल, आपण जाऊ आणि तथागताला भेटू. भगवान तथागतच आपले गुरू होतील."
18) सारीपुत्त उत्तरला, "मित्रा, हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहात आहेत, आणि ते आपल्यालाच मानतात. त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू; मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील."
19) नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले. त्यांच्या जवळ जाऊन ते त्यांना म्हणाले, "मित्रहो, आम्ही तथागत बुद्धांना शरण जाणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत."
20) ते उत्तरले, "महाराज, आम्ही आपल्यामुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो. महाराज, जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्हीही तोच मार्ग पत्करू."
21) नंतर सारीपुत्त आणि मोग्गलान जेथे संजय होता तेथे गेले. त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले, "मित्रा, आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत. तेच आमचे गुरु आहेत."
22) संजय उत्तरला, "छे, छे; मित्रांनो, जाऊ नका. आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ."
23) सारीपुत्त आणि मोग्गलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले.
24) नंतर अडीचशे परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोग्गलान भगवान बुद्ध जेथे राहात होते त्या राजगृहातील वेळु-वनात गेले.
25) सारीपुत्त आणि मोग्गलान दुरुनच येत असताना तथागतांनी पाहिले. त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले, "ते पाहा, भिक्खूहो, दोन सोबती येत आहेत." सारीपुत्त आणि मोग्गलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले, "हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील."
26) वेळु-वनात पोहोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते गेले. त्यांच्यासमोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग वंदन केले आणि आपले मस्तक भगवंतांच्या चरणांवर ठेवून ते तथागतांस म्हणाले, "तथागतांनी आम्हाला दीक्षा द्यावी."
27) नंतर, "एहि भिक्खवें" (Ehi Bhikku)
(भिक्खूंनो, या) हे शब्द तथागतांनी उच्चारले आणि सारीपुत्त, मोग्गलान आणि अडीचशे जटील बुद्धांचे शिष्य झाले.
Comments
Post a Comment