3. माता-पुत्राची व पती-पत्नीची अंतिम भेट
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग पहिला- निकटवर्तीयांच्या भेटी
Part I- The Meeting of those Near and Dear
*************************
3. माता-पुत्राची व पती-पत्नीची अंतिम भेट
The Last Meeting between Mother and Son, and between Wife and Husband
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग पहिला- निकटवर्तीयांच्या भेटी
Part I- The Meeting of those Near and Dear
*************************
3. माता-पुत्राची व पती-पत्नीची अंतिम भेट
The Last Meeting between Mother and Son, and between Wife and Husband
*************************
1) आपल्या मृत्यूपूर्वी महाप्रजापती व यशोधरा ह्यांची तथागत बुद्धांशी भेट होऊ शकली.
2) कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी.
3) प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पुजा केली.
4) तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले. कारण त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते. कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्यामुळे तिच्यात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता. तथागतांची माता समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता.
5) आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. "आता या देहाचा त्याग करुन मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखहर्ता तथागत, मला हे करण्यास अनुमती दे."
6) तर यशोधरेने तथागत बुद्धांना उद्देशून म्हटले की, ती आता अठ्ठ्याहत्तर वर्षांची झाली आहे. त्यावर तथागत म्हणाले की, माझेही आता ऐंशी वर्षे सुरु आहे.
7) यशोधरेने सांगितले की, आजची रात्र ही तिची अखेरची रात्र आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांना मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाची याचना केली नाही.
8). उलट ती त्यांना म्हणाली, "मीच माझे आश्रयस्थान आहे."
9) आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तींवर तिने विजय मिळवला होता.
10) ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती; कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती.
2) कदाचित ही त्यांची अंतिम भेट असावी.
3) प्रथम महाप्रजापती त्यांच्याजवळ गेली आणि तिने त्यांची पुजा केली.
4) तिने कृतज्ञतेने त्यांचे आभार मानले. कारण त्यांनी तिला सद्धर्माने प्राप्त होणारे समाधान दिले होते. कारण तिला आध्यात्मिक जन्म लाभला होता. कारण त्यांच्यामुळे तिच्यात धम्माचा विकास झाला होता. कारण त्यांच्याच सहाय्याने तिने भवसागर पार केला होता. तथागतांची माता समजली जाण्यात तिचा केवढा तरी गौरव झाला होता.
5) आणि नंतर तिने आपली विनंती त्यांच्यापाशी सादर केली. "आता या देहाचा त्याग करुन मृत्यूचा स्वीकार करावा अशी माझी इच्छा आहे. हे दुःखहर्ता तथागत, मला हे करण्यास अनुमती दे."
6) तर यशोधरेने तथागत बुद्धांना उद्देशून म्हटले की, ती आता अठ्ठ्याहत्तर वर्षांची झाली आहे. त्यावर तथागत म्हणाले की, माझेही आता ऐंशी वर्षे सुरु आहे.
7) यशोधरेने सांगितले की, आजची रात्र ही तिची अखेरची रात्र आहे. महाप्रजापतीपेक्षा तिचा स्वर अधिक संयमित होता. महाप्रजापतीप्रमाणे तिने त्यांना मरणाची अनुमती मागितली नाही किंवा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या आश्रयाची याचना केली नाही.
8). उलट ती त्यांना म्हणाली, "मीच माझे आश्रयस्थान आहे."
9) आपल्या जीवनातील सर्व विघातक प्रवृत्तींवर तिने विजय मिळवला होता.
10) ती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यास आली होती; कारण त्यांनीच तिला मार्ग दाखविला आणि शक्ती दिली होती.
Comments
Post a Comment