3. गतकर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानत होते काय? (अंतिम भाग)
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
*************************
दोन- कर्म
Section II- Karma
*************************
3. गतकर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानत होते काय? (अंतिम भाग)
Did the Buddha believe in Past Karma having effect on Future Life?
************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग दुसरा- पारिभाषिक शब्दसाम्यामुळे मौलिक भेद कसे अस्पष्ट राहतात
Part II- How Similarities in Terminology Conceal Fundamental Differences
*************************
दोन- कर्म
Section II- Karma
*************************
3. गतकर्मांचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानत होते काय? (अंतिम भाग)
Did the Buddha believe in Past Karma having effect on Future Life?
************************
1) अशा रीतीने बुद्धांचा कर्मसिद्धान्त हा विज्ञानाशी सुसंगत आहे.
2) पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर त्यांचा विश्वास नव्हता.
3) जन्म हा मातापित्यांपासून आहे आणि बालकाला जन्मत: जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापाकडून; असे बुद्ध मानीत असल्यामुळे बालक हे स्वत:च वारसा घेऊन येते यावर ते कसा विश्वास ठेवणार?
4) या व्यतिरिक्त या विषयावर 'चूळ-दुःख-खंद-सूत्त' या सुत्तात या विषयासंबधी प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध आहे. या सुत्तात बुद्ध आणि जैन यांच्यातील वार्तालाप वर्णित आहे.
5) या संवादात भगवान बुद्ध म्हणतात, - "निगण्ठहो, तुम्ही म्हणता की, 'आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया, वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मींच्या पापांचा निरास होईल. मग तपस्येने मागील पापांचा निरास झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दु:खाचा निरास होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते."
6) बुद्ध म्हणतात, "ह्या माझ्या भाषणाला त्या निगण्ठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, "पूज्य माणसांनो, तुम्हांला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हांस माहीत आहे काय?"
7) "नाही! आम्हांला काहीच माहीत नाही!"
8). "गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हांला काही ज्ञान आहे काय?"
9) "नाही! आम्हांस काहीच माहीत नाही!"
10) "गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हांला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हांला माहीत आहे का?"
11) "नाही; ते आम्हांस काहीच माहीत नाही."
12) दुसरी गोष्ट अशी की, माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते, असे बुद्ध मानतात.
13) देवधम्म सुत्तात बुद्ध म्हणतात, "काही श्रमण, ब्राम्हण अशा मताचे आहेत की, जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात, गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्यकाळात सोसावयाचे काहीच उरत नाही. अकुशल कर्मे क्षय पावतात नि अकुशल कर्मांचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. तेव्हा वेदना नाहीशा होतात आणि वेदना नाहीशा झाल्याने दुःख क्षय पावते, असे निगण्ठांचे म्हणणे आहे."
14) "प्राण्यांचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगण्ठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे; आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते."
15) भगवान बुद्धांची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असतील तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतात? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थितिसापेक्ष आहेत असे मानणारे बुद्ध गतजन्मींच्या कर्मावर विश्वास कसे ठेवतील?
16) गतजन्मीच्या कर्माचा सिद्धान्त हा शुद्ध ब्राम्हणी सिद्धान्त आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात, आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात म्हणून 'गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते!' याच्याशी ते सुसंगत आहे, परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धान्ताशी ते अगदी विसंगत आहे.
17) ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धान्त समजला नाही किंवा जो बुद्धिपुरस्सर बौद्धधम्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहेत असे दाखविण्याचा अट्टाहास करतो त्याने हा सिद्धान्त बौद्ध धम्मात घुसडविला असला पाहिजे.
18) भगवान बुद्धांनी हा सिद्धान्त शिकविलेला असण्याची शक्यता नाही, हे वरील कारणावरून स्पष्ट होईल.
19) याशिवाय भगवान बुद्धांनी हा सिद्धान्त शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे.
20) पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते, हा हिंदु सिद्धान्त अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धान्ताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा?
21) त्याचा एकमेव हेतू 'शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दु:स्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे' हा असावा.
22) नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धान्ताचा शोधच लागला नसता.
23) महाकारुणिक हे ज्यांचे बिरुद प्रसिद्ध आहे, असे तथागत बुद्ध अशाप्रकारच्या सिद्धान्ताचे समर्थक असतील, अशी कल्पनाही करणे शक्य नाही.
2) पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर त्यांचा विश्वास नव्हता.
3) जन्म हा मातापित्यांपासून आहे आणि बालकाला जन्मत: जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापाकडून; असे बुद्ध मानीत असल्यामुळे बालक हे स्वत:च वारसा घेऊन येते यावर ते कसा विश्वास ठेवणार?
4) या व्यतिरिक्त या विषयावर 'चूळ-दुःख-खंद-सूत्त' या सुत्तात या विषयासंबधी प्रत्यक्ष पुरावा उपलब्ध आहे. या सुत्तात बुद्ध आणि जैन यांच्यातील वार्तालाप वर्णित आहे.
5) या संवादात भगवान बुद्ध म्हणतात, - "निगण्ठहो, तुम्ही म्हणता की, 'आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया, वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मींच्या पापांचा निरास होईल. मग तपस्येने मागील पापांचा निरास झाल्यावर आणि नवी पापकर्मे करावयाचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दु:खाचा निरास होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीसे होते."
6) बुद्ध म्हणतात, "ह्या माझ्या भाषणाला त्या निगण्ठांनी होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, "पूज्य माणसांनो, तुम्हांला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हांस माहीत आहे काय?"
7) "नाही! आम्हांला काहीच माहीत नाही!"
8). "गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हांला काही ज्ञान आहे काय?"
9) "नाही! आम्हांस काहीच माहीत नाही!"
10) "गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हांला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हांला माहीत आहे का?"
11) "नाही; ते आम्हांस काहीच माहीत नाही."
12) दुसरी गोष्ट अशी की, माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते, असे बुद्ध मानतात.
13) देवधम्म सुत्तात बुद्ध म्हणतात, "काही श्रमण, ब्राम्हण अशा मताचे आहेत की, जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात, गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्यकाळात सोसावयाचे काहीच उरत नाही. अकुशल कर्मे क्षय पावतात नि अकुशल कर्मांचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो. तेव्हा वेदना नाहीशा होतात आणि वेदना नाहीशा झाल्याने दुःख क्षय पावते, असे निगण्ठांचे म्हणणे आहे."
14) "प्राण्यांचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्मकाळच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगण्ठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे; आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरीसुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते."
15) भगवान बुद्धांची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्वाची आहेत. जर बुद्ध गतजन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवीत असतील तर त्यासंबंधी शंका का निर्माण करतात? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थितिसापेक्ष आहेत असे मानणारे बुद्ध गतजन्मींच्या कर्मावर विश्वास कसे ठेवतील?
16) गतजन्मीच्या कर्माचा सिद्धान्त हा शुद्ध ब्राम्हणी सिद्धान्त आहे. ते आत्म्याचे अस्तित्व मानतात, आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात म्हणून 'गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते!' याच्याशी ते सुसंगत आहे, परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धान्ताशी ते अगदी विसंगत आहे.
17) ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धान्त समजला नाही किंवा जो बुद्धिपुरस्सर बौद्धधम्म आणि हिंदू धर्म सदृश्य आहेत असे दाखविण्याचा अट्टाहास करतो त्याने हा सिद्धान्त बौद्ध धम्मात घुसडविला असला पाहिजे.
18) भगवान बुद्धांनी हा सिद्धान्त शिकविलेला असण्याची शक्यता नाही, हे वरील कारणावरून स्पष्ट होईल.
19) याशिवाय भगवान बुद्धांनी हा सिद्धान्त शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे.
20) पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते, हा हिंदु सिद्धान्त अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धान्ताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा?
21) त्याचा एकमेव हेतू 'शासन अथवा समाज यांना दरिद्री लोकांच्या दु:स्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे' हा असावा.
22) नाहीतर असल्या अमानुष आणि बुद्धिविसंगत सिद्धान्ताचा शोधच लागला नसता.
23) महाकारुणिक हे ज्यांचे बिरुद प्रसिद्ध आहे, असे तथागत बुद्ध अशाप्रकारच्या सिद्धान्ताचे समर्थक असतील, अशी कल्पनाही करणे शक्य नाही.
Comments
Post a Comment