3. अंतिम शब्द
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
3. अंतिम शब्द
Last Words
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सातवा खंड- भ्रमणिकाची अंतिम यात्रा
Book VII- The Wanderer's Last Journey
*************************
भाग तिसरा - महापरिनिर्वाण
Part III- His End
*************************
3. अंतिम शब्द
Last Words
*************************
1) तथागत बुद्ध आनंदाला नंतर म्हणाले:
2) "आनंदा! कदाचित तू असे म्हणशील, 'गुरुंची वाणी आता लोपली. आता आम्हास कोणी गुरु उरला नाही.' पण आनंद, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकविला, सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु!" (the Norm and discipline taught and enjoyed by me, they shall be your teachers when I am gone.)
3) "आणि आनंद! भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात; पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारील तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा 'मित्र' म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारील तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा 'भन्ते' असे संबोधावे."
4) "आनंद! माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत."
5) "आनंद! तुला माहितच आहे की, भिक्खू छन्न कसा हट्टी, विकृत आणि बेशिस्त आहे."
6) "आनंद! माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी." (the extreme penalty)
7) "तथागत! सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय?"
8). "छन्न काय वाटेल ते बोलो, कोणी त्याच्याशी बोलू नये. त्याची कानउघाडणी करु नये, त्याला शिकवू नये. त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधारेल."
9) नंतर तथागत बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले:
10) "जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोधळ असेल तर भिक्खूवर्गहो, आताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करु नये की, आमचे गुरु प्रत्यक्ष समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही."
11) असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले.
12) त्यानंतर तथागतांनी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूंनी मौन सोडले नाही.
13) तेव्हा तथागत म्हणाले, "कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल. पण भिक्खूहो, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा!"
14) तरीही भिक्खू अबोलच राहिले.
15) तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला, "आश्चर्य आहे, अदभुत आहे. तथागत! ह्या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले. ह्या भिक्खूंपैंकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत,धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यत्किंचितही संदेह नाही."
16) "आनंद! तू हे विश्वासाने बोलतोस; पण तथागतांना ही जाणीव आहे की, एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. ह्या माझ्या पाचशे भिक्खूंतला सर्वात मागासलेला निदान स्त्रोतापन्न तरी खास असेलच. त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे. त्याला संबोधी प्राप्त करुन घेण्याची खात्री आहे."
17) तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले:
18) *"भिक्खूहो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की, सर्व संस्कारित गोष्टी अनित्य आहेत (निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होणार आहे). अप्रमादपूर्वक, सावधपणे, काळजीपूर्वक मार्गक्रमण करा!"*
("Come now, brethren, I do remind ye, 'Subject to decay are all compounded things.' Do ye abide in heedfulness.")
19) तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते.
2) "आनंदा! कदाचित तू असे म्हणशील, 'गुरुंची वाणी आता लोपली. आता आम्हास कोणी गुरु उरला नाही.' पण आनंद, तुला असे वाटता कामा नये. जो धम्म आणि विनय मी शिकविला, सांगितला आहे तोच माझ्या पश्चात तुमचा गुरु!" (the Norm and discipline taught and enjoyed by me, they shall be your teachers when I am gone.)
3) "आणि आनंद! भिक्खू परस्परांशी बोलताना मित्रभावाने एकमेकांना हल्ली संबोधतात; पण माझ्या पश्चात ही प्रथा बंद झाली पाहिजे. ज्येष्ठ जेव्हा कनिष्ठाला हाक मारील तेव्हा त्याच्या नावाने, गोत्र नावाने किंवा 'मित्र' म्हणून त्याने त्याला संबोधावे व कनिष्ठ जेव्हा ज्येष्ठाला हाक मारील तेव्हा त्याने त्याला भगवान किंवा 'भन्ते' असे संबोधावे."
4) "आनंद! माझ्या पश्चात जर संघाला आवश्यक वाटले तर किरकोळ अथवा गौण नियम त्याने रद्द करावेत."
5) "आनंद! तुला माहितच आहे की, भिक्खू छन्न कसा हट्टी, विकृत आणि बेशिस्त आहे."
6) "आनंद! माझ्या पश्चात छन्नाला सर्वोच्च शिक्षा दिली जावी." (the extreme penalty)
7) "तथागत! सर्वोच्च शिक्षा म्हणजे काय?"
8). "छन्न काय वाटेल ते बोलो, कोणी त्याच्याशी बोलू नये. त्याची कानउघाडणी करु नये, त्याला शिकवू नये. त्याला एकटे सोडून द्यावे. कदाचित ह्यामुळे तो सुधारेल."
9) नंतर तथागत बुद्ध भिक्खूंना उद्देशून बोलले:
10) "जर कोणा भिक्खूच्या मनात कदाचित बुद्धाबाबत, धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत संदेह किंवा गोधळ असेल तर भिक्खूवर्गहो, आताच तो त्याने विचारावा. मागाहून पश्चाताप करु नये की, आमचे गुरु प्रत्यक्ष समोर असताना त्यांना प्रत्यक्ष शंका सांगण्याची हिंमत झाली नाही."
11) असे सांगितल्यावर भिक्खू गप्प राहिले.
12) त्यानंतर तथागतांनी दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा तेच शब्द उच्चारले आणि तिसऱ्या वेळीही भिक्खूंनी मौन सोडले नाही.
13) तेव्हा तथागत म्हणाले, "कदाचित गुरुचा मान राखावा म्हणून तुम्ही विचारत नसाल. पण भिक्खूहो, तुम्ही मला मित्रासमान मानून काय विचारायचे ते विचारा!"
14) तरीही भिक्खू अबोलच राहिले.
15) तेव्हा आनंद तथागतांना म्हणाला, "आश्चर्य आहे, अदभुत आहे. तथागत! ह्या माझ्या संघाने मला आज निश्चिंत केले. ह्या भिक्खूंपैंकी एकाच्याही मनात बुद्धाबाबत,धम्माबाबत, संघाबाबत, मार्गाबाबत किंवा मार्गाच्या वाटेबाबत यत्किंचितही संदेह नाही."
16) "आनंद! तू हे विश्वासाने बोलतोस; पण तथागतांना ही जाणीव आहे की, एकाही भिक्खूच्या मनात कसलाही संदेह किंवा गोंधळ नाही. ह्या माझ्या पाचशे भिक्खूंतला सर्वात मागासलेला निदान स्त्रोतापन्न तरी खास असेलच. त्याला अधोगतीपासून सुटण्याची खात्री आहे. त्याला संबोधी प्राप्त करुन घेण्याची खात्री आहे."
17) तेव्हा तथागत भिक्खूंना उद्देशून बोलले:
18) *"भिक्खूहो, मी तुम्हाला पुन्हा स्मरण देतो की, सर्व संस्कारित गोष्टी अनित्य आहेत (निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट नष्ट होणार आहे). अप्रमादपूर्वक, सावधपणे, काळजीपूर्वक मार्गक्रमण करा!"*
("Come now, brethren, I do remind ye, 'Subject to decay are all compounded things.' Do ye abide in heedfulness.")
19) तथागतांचे हेच अखेरचे शब्द होते.
Comments
Post a Comment