4. जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
सहावा खंड- बुद्ध आणि त्यांचे समकालीन
Book VI- He and His Contemporaries
*************************
भाग दुसरा- बुद्धांचे विरोधक व शत्रू
Part II- His Enemies
*************************
4. जैन तीर्थक आणि प्राणघाताचा आरोप
Jains and a False Charge of Murder
*************************

1) तीर्थकांना वाटू लागले की, श्रमण गौतमाच्या प्रभावामुळे लोक आता आपणास आदर दर्शवीत नाहीत. एवढेच नव्हे तर आपल्या अस्तित्वाची देखील त्यांना जाणीव दिसत नाही.

2) तीर्थकांनी विचार केला, त्याचा प्रभाव नाहीसा करण्यासाठी काही तरी उपाय केला पाहिजे. कुणाचे तरी सहाय्य घेतले पाहिजे. सुंदरीच्या मदतीने हे काम यशस्वी होऊ शकेल.

3) ते सुंदरीकडे गेले आणि तिला म्हणाले, "भगिनी, तू अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहेस. श्रमण गौतमाबद्दल जर तू कुवार्ता प्रसृत केलीस तरा लोक तिच्यावर विश्वास ठेवतील. आणि त्यामुळे त्यांचा प्रभाव कमी होईल."

4) दररोज सांयकाळी जेव्हा जेतवनातून शहराकडे लोक परत येत त्या वेळी हातात पुष्पमाला, कर्पूर आणि सुगंध घेऊन जेतवनाकडे सुंदरी जात असे. परतणारे लोक विचारत, "सुंदरी कुठे जातेस?" त्यावर ती उत्तर देत असे, "मी श्रमण गौतमाकडे त्यांच्या गंधकुटीत राहण्यास चालले आहे."

5) तीर्थकांच्या उद्यानात रात्र घालवून प्रातःकाल होताच ती तिथून परतत असे. जे कोणी तिला विचारत की, "रात्रभर तू कोठे होतीस?" त्यांना ती सांगत असे, "श्रमण गौतमांच्याकडे."

6) काही दिवसांनंतर तीर्थकांनी मारेकरी बोलावून त्यांना सांगितले, "सुंदरीला ठार मारा आणि गौतमाच्या गंधकुटीजवळच्या कचराकुंडीत तिचा देह फेकून द्या." मारेकऱ्यांनी त्याप्रमाणे केले.

7) त्यानंतर तीर्थकांनी सरकारी न्यायाधिकाऱ्याकडे तक्रार केली की, "सुंदरी जेतवनात जात असे आणि आता ती कुठे दिसत नाही."

8). सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने शोध करताना कचरापट्टीत तिचा देह त्यांना आढळला.

9) आपल्या गुरुंची अब्रू वाचविण्यासाठी सुंदरीची हत्या केल्याचा आरोप तीर्थकांनी तथागतांच्या शिष्यांवर केला.

10) सुंदरीची हत्या केल्याबद्दल मिळालेल्या धनाची वाटणी मारेकरी दारुच्या गुत्त्यात करीत असताना आपआपसात भांडू लागले.

11) सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना ताबडतोब पकडले आणि त्यांनी गुन्हा कबूल केला. ज्यांच्या प्रेरणेने ही हत्या करण्यास प्रवृत्त झाले त्या तीर्थकांचाही त्यांनी उल्लेख केला.

12) अशा प्रकारे तीर्थकांचा उरलासुरला प्रभावही त्यांनी गमावला.

Comments

Popular posts from this blog

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म