5. वैराग्याचा त्याग
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म~
लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*********************
प्रथम खंड- "बोधिसत्त्व हे बुद्ध कसे झाले"
*********************
*********************
भाग तिसरा- नव्या प्रकाशाच्या शोधात
In Search of New Light
In Search of New Light
*********************
5. वैराग्याचा त्याग
Abandonment of Asceticism
**************************
*************************
प्रथम खंड- भाग तिसरा- समाप्त.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग चवथा - ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी
१. नव्या प्रकाशासाठी चिंतन
*********************
Abandonment of Asceticism
**************************
1) गौतमाने सुरु केलेली तपश्चर्या आणि त्याचे आत्मक्लेश यांचे स्वरुप अत्यंत उग्र असे होते. अशा प्रकारची त्याची तपश्चर्या व आत्मक्लेश सहा वर्षे चालले होते.
2) सहा वर्षांनंतर त्याचे शरीर इतके क्षीण झाले होते की, त्याला हालचालही करता येत नव्हती.
3) तरीही त्याला नवीन प्रकाश दिसला नव्हता, आणि ज्या प्रश्नावर त्याचेे मन केंद्रित झाले होते त्या ऐहिक दुःखाविषयीच्या प्रश्नाचा त्याला यत्किंचितही उलगडा झाला नव्हता.
4) तो स्वतःशीच विचार करु लागला, "हा मार्ग वासनामुक्त होण्याचा किंवा पूर्ण ज्ञानाचा अथवा मुक्तीचा नाही."
5) "काही जण इहलोकासाठी दुःख भोगतात, तर इतर लोक स्वर्गलोकासाठी कष्ट सहन करतात. आशेच्या पाठीमागे लागल्यामुळे दुःखी ठरलेले आणि नेहमी ध्येयच्युत होणारे सर्व प्राणिमात्र सुखाच्या आशेने निश्चितपणे दुःखात पडतात."
6) "माझ्या बाबतीत देखील काहीसे असेच झाले नाही काय?"
7) "मी प्रयत्नांना दोष देत नाही-- कारण हा प्रयत्न हीन दर्जाचा मार्ग टाळून उच्च दर्जाचा मार्ग अनुसरण्याचा आहे."
8) "पण माझा प्रश्न असा आहे की, शारीरिक क्लेशांना धर्म म्हणता येईल काय?"
9) "ज्याअर्थी मनाच्या प्रेरणेने शरीर कार्य करते किंवा कार्य करण्याचे थांबवते, त्या अर्थी विचारावर ताबा ठेवणे हेच योग्य होय. विचाराखेरीज शरीर हे कुत्र्याप्रमाणे आहे."
10) "जर केवळ शरीराचाच विचार करावयाचा असता, तर अन्नशुद्धीने पावित्र्य लाभले असते. पण मग कर्त्यामध्येही पावित्र्य असतेच; पण त्याचा काय उपयोग?"
11) "ज्याची शक्ती नष्ट झाली आहे, भूक तहान आणि थकवा यांनी जो गळून गेला आहे, थकव्यामुळे ज्याचे मन शांत राहिलेले नाही, त्याला नवा प्रकाश प्राप्त होऊ शकत नाही."
12) "जे ध्येय मनाच्या सहाय्याने गाठावयाचे आहे ते ज्याला संपूर्ण शांतता लाभलेली नाही तो कसे गाठू शकेल?'
13) "खरी शांती आणि एकाग्रता शारीरिक गरजांच्या नियमित तृप्तीनेच योग्य प्रकारे लाभते."
14) त्या वेळी उरवेला येथे सेनानी नावाचा एक गृहस्थ राहात होता. सुजाता नावाची त्याला एक मुलगी होती.
15) सुजाताने एका वटवृक्षाला नवस केला होता आणि तिला मुलगा झाल्यास दरवर्षी तो नवस फेडण्याचा तिने संकल्प केला होता.
16) तिची इच्छा पूर्ण झाल्यावर तिने पन्ना नावाच्या दासीला नवस फेडण्याची जागा तयार करण्यासाठी पाठविले.
17) त्या वटवृक्षाखाली गौतम बसलेला पाहून पन्नाला वाटले की, तो वृक्षदेवच अवतरला आहे.
18) सुजाता आली आणि स्वतः शिजविलेले अन्न तिने एका सोन्याच्या पात्रात गौतमास वाढले.
19) ते पात्र घेऊन तो नदीकाठी गेला. सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर त्याने आंघोळ केली आणि मग त्या अन्नाचे भक्षण केले.
20) याप्रमाणे त्याची वैराग्यमार्गाची कसोटी संपली.
21) तपश्चर्या आणि आत्मक्लेश यांचा गौतमाने त्याग केल्यामुळे त्याच्याबरोबर असलेले ते पाच तपस्वी त्याच्यावर रागावले आणि तिरस्काराने ते त्याला सोडून गेले.
प्रथम खंड- भाग तिसरा- समाप्त.









*************************
क्रमश: .....
रोज वाचा, "बुद्ध आणि त्यांचा धम्म"
पुढील भागात:
भाग चवथा - ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी
१. नव्या प्रकाशासाठी चिंतन
*********************
Comments
Post a Comment