6. आपण(स्वत्व) आणि आत्मविजय
भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग तिसरा- बौद्ध जीवनमार्ग
Part III- Buddhist Way of Life
*************************
6. आपण(स्वत्व) आणि आत्मविजय
On Self and Self- Conquest
*************************
~लेखक: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
*************************
चवथा खंड- धर्म (Religion) आणि धम्म
Book IV- Religion and Dhamma
*************************
भाग तिसरा- बौद्ध जीवनमार्ग
Part III- Buddhist Way of Life
*************************
6. आपण(स्वत्व) आणि आत्मविजय
On Self and Self- Conquest
*************************
1) *जर स्वतःला स्वत्व, मीपणा असेल तर त्या स्वत्वावर विजय मिळविण्याचा (आत्मविजय) परिपाठ ठेवावा.*
2) *हा बौद्ध जीवनमार्ग आहे.*
3) मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे. दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण.
4) जो मूर्ख मनुष्य अर्हत, अरिय, शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धान्ताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते.
5) आपणच अकुशल कर्म (पाप) करतो आणि आपणच त्यामुळे मलीन होतो. आपणच पापाचा त्याग करतो आणि आपणच आपणाला शुद्ध करू शकतो; शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही.
6) जो केवळ सुखोपभोगांसाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे.
7) ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रियदमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्रकाय पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही.
8). जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वत:वर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.
9) प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी. मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.
10) स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो.
11) स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही.
12) युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून, जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर होय.
13) प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.
14) स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो.
15) मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वत:च स्वत:चे रक्षण करू शकतो त्याला स्वत:सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे.
16) जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.
17) स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करायला येत नाही.
18) मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वत:च स्वत:चे संरक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे.
2) *हा बौद्ध जीवनमार्ग आहे.*
3) मनुष्य हा स्वतःचाच स्वामी आहे. दुसऱ्या कोणाचा स्वामी असू शकणार? मनुष्य जेव्हा स्वतःचा संयम करू शकतो तेव्हा त्याच्यासारखा स्वामी मिळणे कठीण.
4) जो मूर्ख मनुष्य अर्हत, अरिय, शीलवान माणसाचे शासन उल्लंघितो आणि खोट्या धर्मसिद्धान्ताच्या मागे लागतो, त्याचे ते दुष्कृत्य कथ्थक बोरूच्या फळासारखे त्याच्या स्वतःच्याच विनाशाला कारणीभूत होते.
5) आपणच अकुशल कर्म (पाप) करतो आणि आपणच त्यामुळे मलीन होतो. आपणच पापाचा त्याग करतो आणि आपणच आपणाला शुद्ध करू शकतो; शुद्धी आणि अशुद्धी ह्या स्वतःवरच अवलंबून असतात. कोणी दुसऱ्याला शुद्ध करू शकत नाही.
6) जो केवळ सुखोपभोगांसाठी हपापलेला आहे, जो असंयमित, खादाड, आळशी आणि दुबळा आहे, तो आपल्याच आतताईपणाने नाश पावेल. ज्याप्रमाणे वाऱ्याने दुबळे झाड नाश पावते त्याप्रमाणे.
7) ज्याच्या ठिकाणी भोगलालसा नाही, ज्याने इंद्रियदमन केलेले आहे, जो खाण्यात नेमस्त असतो, जो विश्वासार्ह व बळकट असतो तो ज्याप्रमाणे वज्रकाय पर्वत वाऱ्याने उलथून पडत नाही त्याप्रमाणे तो पतन पावत नाही.
8). जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वत:वर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.
9) प्रथम स्वतःची सन्मार्गावर स्थापना करावी. मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.
10) स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो.
11) स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करण्याला येत नाही.
12) युद्धात शेकडो वीरांना जिंकणारा परमवीर नसून, जो आत्मविजय मिळवितो तोच परमवीर होय.
13) प्रथम स्वतःचीच सन्मार्गावर स्थापना करावी व मग दुसऱ्याला त्याचा उपदेश करावा. शहाण्या माणसाने स्वतःला दोष लागेल असे वर्तन करता कामा नये.
14) स्वतःचे दमन करणे हे फार कठीण आहे असे म्हणतात. जर माणूस दुसऱ्याला ज्याप्रमाणे उपदेश करतो त्याप्रमाणे स्वतः वागला तर असा आत्मसंयमी हाच खरा दुसऱ्यावर स्वामित्व गाजविणारा होऊ शकतो.
15) मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वत:च स्वत:चे रक्षण करू शकतो त्याला स्वत:सारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे.
16) जर माणसाला स्वतःसंबंधी प्रेम असेल तर त्याने स्वतःवर दक्षतेने लक्ष ठेवले पाहिजे.
17) स्वतः केलेल्या पापाबद्दल स्वतःलाच भूर्दंड भरावा लागतो. माणूस स्वतःला स्वतःच शुद्ध करू शकतो. तेथे दुसरा कोणी शुद्ध करायला येत नाही.
18) मनुष्य हा स्वतःच स्वतःचा संरक्षक असतो. त्याला दुसरा कोण संरक्षक असणार? जो स्वत:च स्वत:चे संरक्षण करू शकतो त्याला स्वतःसारखा दुसरा संरक्षक मिळणे दुर्लभ आहे.
Comments
Post a Comment